शिरूरमध्ये तीन बालकांचे अपहरण; एका बालिकेचा खून

शिरूरमध्ये तीन बालकांचे अपहरण; एका बालिकेचा खून

वाडागाव (ता. शिरूर) येथील तीन बालकांचे युवकाने अपहरण करून एका बालिकेचा खून करून मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या प्रकरणाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून, शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे.

गायत्री रणजित कुमार रविदास (वय 7, रा. वाडागाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. झारखंड) असे विहिरीत मृतदेत आढळलेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी बबन रामपीर यादव (वय 42, रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडागाव येथील गायत्री, कार्तिक रविदास आणि अभिजित पासवान (दोघे वय 3) हे तिघे शनिवारी (दि. 22) बेपत्ता झाले. याबाबत विनादेवी रणजितकुमार रविदास या महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, निरीक्षक दीपरतन गायकवाड, अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहायक उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, हवालदार आत्माराम तळोले, रोहिदास पारखे, नवनाथ नाईकडे, किशोर तेलंग, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल दांडगे, औदुंबर वाघमारे, ललित चक्रनारायण आदींनी बालकांचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता बबन यादव हा दुचाकीहून तिघा बालकांना घेऊन गेल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती करून अपहृत बालकांचा शोध सुरू केला. यातील तीन व चार वर्षीय चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ (ता. खेड) येथे असल्याचे समजल्यावर हे शोधपथक दोन्ही मुलांपर्यंत पोहोचले व दोघांनाही ताब्यात घेतले.

दरम्यान, बबन यादव याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वरील तीन बालकांचे अपहरण केल्याची कबुली दिली आणि यापैकी दोघांना बहुळमध्ये सोडले, तर गायत्रीला विहिरीत टाकल्याची माहिती दिली. त्यानुसार सर्च ऑपरेशन करून बहुळ येथील विहिरीतून मयत गायत्रीचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली.

म्हणून केले अपहरण

अपहृत तीनही बालके, त्यांचे कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय असून, मृत गायत्रीच्या मावशीशी आरोपीचे अनैतिक संबंध होते. मात्र, त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबीयांचा विरोध असल्याने या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तीनही बालकांचे आपण अपहरण केल्याचे आणि गायत्रीला विहिरीत टाकल्याचे आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा
लाडक्या बहि‍णींनी राज्य सरकारला मालामाल केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या तिजोरीवर ताण आला. भावाच्या खिशावर ताण आल्याचे लक्षात येताच बहिणीचा जीव...
‘छावा’ची स्क्रीप्ट ऐकताच विकी कौशल भावूक झाला, हात जोडून म्हणाला…; लेखकाचा मोठा खुलासा
‘छावा’ पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मनाला भिडणारी पोस्ट; ‘हाथी घोडे, तोफ तलवारे..’
रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात अखंड बुडाले होते; ते प्रपोज करणार तेवढ्यात लाईट गेली अन् सगळंच फिसकटलं,काय आहे तो किस्सा
नवरा म्हणाला, तुझे ड्रायव्हरसोबत संबंध म्हणून…, मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली अभिनेत्रीची साथ
त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाविरोधात पुरातत्त्व विभागाचा इशारा
१४ तास बेशुद्ध, बीपी लो… बिग बींना केले होते मृत घोषित, वाचा नेमकं काय झालं होतं?