तारीख पे तारीख! पालिका निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

तारीख पे तारीख! पालिका निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकांसह राज्यातील इतर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत पालिकांतील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर राज्य सरकार भूमिका मांडणार होतं. त्यावर प्रलंबित निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आता याप्रकरणी 4 मार्चला सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, राज्यातील मुंबई-ठाणेसह राज्यातील प्रमुख पालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या निवडणुका वेळीच घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या. त्या याचिकांवर मंगळवारी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती. जी आता लांबणीवर गेली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान “या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी...
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा
राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर