Best Bus Strike – मुंबईत बेस्ट सेवा विस्कळीत, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे गोंधळ
मुंबईतील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे शहरातील बेस्ट सेवेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बेस्ट बसने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे चाकरमानी आणि मुंबई दर्शनासाठी येणारे पर्यटक सुद्धा बेस्ट बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु बेस्ट बसच्या कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्यामुळे प्रवशांची मोठी गैरसोय होत आहे. बसस्टॉपवर प्रवशांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांच्या वेळेचे गणित कोलमडले आहे. आपल्या गंतव्यस्थानावर पोहचण्यासाठी प्रवशांना अनेक तास उभे रहावे लागत आहे. कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे शहारातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List