दिल्ली–एनसीआर भूकंपाने हादरले

दिल्ली–एनसीआर भूकंपाने हादरले

दिल्ली-एनसीआर आज भूकंपाने हादरले. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी दिल्लीकरांना 4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपामुळे कुठेही पडझड किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून लोकांना शांत राहाण्याचे आवाहन केले असून अधिकारी परिस्थितीतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली. दरम्यान, भूकंपामुळे काही ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली.

भूकंपाचे केंद्र धौला कुआन येथील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याठिकाणी दर दोन ते तीन वर्षांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याआधी 2015 मध्ये या ठिकाणी 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दिल्लीकर सुरक्षित आहेत अशी आशा करतो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल करावा असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे...
‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष
दृश्यम- 3 लवकरच येणार साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!
Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल
जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे यांची मागणी