सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘कोण कोणाला भेटले, यावर…’

सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘कोण कोणाला भेटले, यावर…’

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने खळबळ उडाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धस आणि मुंडे भेट झाली. या भेटीला बावनकुळेंसह धस यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे धस यांच्यावर टीका होऊ लागली, तसेच दोघांमध्ये समेट तर झाला नाही ना, असा संशयही व्यक्त होऊ लागला. यावार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तत्पूर्वी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केले होते.

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेणे योग्य नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. याउलट जाऊन फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोण कोणाला भेटले यावरून राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद सुरू रहायला हवा.

मस्साजोग प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी खंबीर भूमिका घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. अशा प्रकारे खंबीर भूमिका घेत असताना कोणाशी संवात सोडून टाकायचा असे करण्याची आवश्यकता नाही. धनंजय मुंडे राज्याचे मंत्री असून एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर कोणताही फरक पडत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

आमदार धसांनी मुंडेची भेट घेणे योग्य नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केले मत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे...
‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष
दृश्यम- 3 लवकरच येणार साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!
Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल
जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे यांची मागणी