ठाणे पालिका मुख्यालयाची वीटही रचली नाही; ठेकेदारावर मात्र 17 कोटींची खिरापत

ठाणे पालिका मुख्यालयाची वीटही रचली नाही; ठेकेदारावर मात्र 17 कोटींची खिरापत

रेमंडच्या भूखंडावर ठाणे महापालिकेचे नवे प्रशस्त मुख्यालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 282 कोटींचा खर्च येणार असून राज्य सरकारने पालिकेला भरघोस निधी दिला आहे. पण प्रत्यक्षात या मुख्यालयाची एकही वीट अद्यापि रचण्यात आलेली नाही. तरीदेखील पायाभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली मेसर्स के. एम. व्ही. प्रोजेक्ट या ठेकेदाराला 17 कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली आहे. काम करण्यापूर्वीच अॅडव्हान्स पेमेंट दिले असून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सरकारी निधीची उधळपट्टी करून ठेकेदारावर मेहेरबान होण्याची एवढी घाई कशासाठी, असा सवाल विचारण्यात येत आहे.

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या भूखंडावर प्रशस्त प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. सुमारे 727 कोटींपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्य शासनामार्फत शंभर टक्के निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात 250 कोटी मंजूर झाले असून 100 कोटींचा पहिला हप्ता पालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. उद्यानाचे आरक्षण शासन स्तरावर बदलल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आंदोलन केले होते. हा वाद सुरू असताना पालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा ठेका दिलेल्या कंपनीवर 17 कोटी रुपये उधळले असल्याचे समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे...
‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष
दृश्यम- 3 लवकरच येणार साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!
Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल
जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे यांची मागणी