आमदार धसांनी मुंडेची भेट घेणे योग्य नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केले मत

आमदार धसांनी मुंडेची भेट घेणे योग्य नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केले मत

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेणे योग्य नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्यादृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मंत्री रामदास आठवले शिर्डीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेणे योग्य नाही.’ दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अधिक दक्ष राहून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींच्या जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. धर्मांतर करून घेणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, असेही ते म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात आरपीआयला चार ते पाच जिल्हा परिषद जागा मिळाव्यात. जागा मिळाल्या नाहीत, तर काही ठिकाणी आरपीआय स्वतंत्र निवडणूक लढवेल. महायुतीला आरपीआयची आवश्यकता असल्यामुळे जागांबाबत योग्य समन्वय साधला जाईल, असेही मंत्री आठवले म्हणाले.

यावेळी विजय वाकचौरे, अण्णासाहेब वायदंडे, प्रकाश लोंढे, सुरेंद्र थोरात, पप्पू बनसोडे, संदीप सोनवणे, धनंजय निकाळे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे...
‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष
दृश्यम- 3 लवकरच येणार साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!
Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल
जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे यांची मागणी