सरकारमुळे दीड लाख कंत्राटदार कर्जबाजारी, वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा; थकीत 90 हजार कोटी मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहणार

सरकारमुळे दीड लाख कंत्राटदार कर्जबाजारी, वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा; थकीत 90 हजार कोटी मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहणार

पायाभूत सुविधांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे सुमारे 90 हजार कोटी रुपये महायुती सरकारने थकवल्यामुळे त्यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. थकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा आज कंत्राटदारांनी दिला. बँकांमधून कर्ज घेऊन कंत्राटदार कामे करतात, परंतु सरकारकडून पैसेच मिळाले नसल्याने कंत्राटदारांना बँकांकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात भुकेकंगाल होऊन आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही कंत्राटदारांनी दिला आहे.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय), महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना (महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन- एमएससीए), हॉट मिक्स असोसिएशन या संघटनांनी एकत्र येऊन 5 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरसह राज्याच्या विविध भागांतील रस्ते, कालवे, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांची कामे ठप्प पडली आहेत. बीएआयने आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.

सरकारकडील आमच्या थकबाकीची एकूण रक्कम 90,000 कोटी रुपयांच्या वर आहे. या थकबाकीमुळे कामे पुढे सुरू ठेवणे आणि अस्तित्व कायम राखणे आम्हाला कठीण जात आहे. कंत्राटदार बँकांकडून कामासाठी घेतलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणावर व्याज भरत आहेत. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे याप्रसंगी बीएआयचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता म्हणाले. तर सरकारने आमची थकबाकी दिल्याशिवाय नवीन कामांच्या निविदा काढू नयेत अशी मागणी अविनाश पाटील यांनी केली. ‘बीएआय’चे राज्य अध्यक्ष अनिल सोनावणे यांनी कंत्राटदार सरकारविरुद्ध न्यायालयाची दारे ठोठावण्याचाही विचार करत असल्याचे म्हटले आहे.

कुणाकडे किती थकबाकी

सार्वजनिक बांधकाम विभाग 46,000 कोटी

ग्रामविकास विभाग 8,000 कोटी

जल जीवन मिशन 18,000 कोटी

जलसंपदा विभाग 19,700 कोटी

नगरविकास विभाग 17,000 कोटी

इतरही विभागांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे येणे बाकी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटासोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सुद्धा पुन्हा...
“लाखो रुपये असेल…”, प्राजक्ता माळीने सांगितला तिचा महिन्याचा खर्च किती?
प्राजक्ता माळीला मोठा झटका; महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध
‘छावा’च्या पुढे नतमस्तक बॉक्स ऑफिस, 200 – 300 कोटी विसरा, जगभरातील कमाई जाणून उंचावतील भुवया
संजीवनी बूटी तर घरीच मिळाली; दिवसातून दोनदा चावा, डॉक्टरला करा दूरूनच रामराम
ट्रिपल एक्सेल ड्रेस निवडताना या गोष्टींचा नक्की विचार करा! तुम्हीही दिसाल मस्त स्लिम
…अखेर एलियाच्या कुटुंबाला शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या परदेशी तरुणाला भावाकडे सोपवले