गैरव्यवस्थापनामुळेच जनतेला त्रास सहन करतेय; वाहतूक कोंडीवरून अखिलेश यादव यांचा योगी सरकारवर निशाणा

गैरव्यवस्थापनामुळेच जनतेला त्रास सहन करतेय; वाहतूक कोंडीवरून अखिलेश यादव यांचा योगी सरकारवर निशाणा

कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. अखिलेश म्हणाले की, सरकारने सर्व व्यवस्था करायला हवी होती. जर असे झाले असते तर जनतेला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नसता. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की आम्ही 100 कोटी लोकं येतील या अंदाजाने व्यवस्था केली आहे. मात्र, येथे येणाऱ्या भाविकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे, याला सरकारचे गैरव्यवस्थापनच जाबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सरकारने व्यवस्था करायला हव्या होत्या. मात्र, सरकारने याचा काहीही विचार केला नाही. असलेल्या व्यवस्था सरकारने बिघडवल्या. आपल्या राज्यात इंजिनिअर, पोलीस अधिकारी,वाहतूक अधिकारी, सनदी अधिकारी यांची कमतरता नाही. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांना संधी दिली जात नाही, तेव्हा अशा परिस्थिती उद्भवतील. सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले. त्यामुळे गैरव्यावस्था वाढली आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असेही अखिलेश म्हणाले.

अखिलेश म्हणाले की आज उत्तर प्रदेशात आयएएसची कमतरता नाही, आयपीएसची कमतरता नाही, चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता नाही. मात्र, त्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी वापरले जाते. आतापर्यंत हरवलेल्यांची यादी, मृत्युमुखी पडलेल्यांची यादी, वाटेत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर झालेली नाही. ते डिजीटल कुंभमेळ्याबद्दल बोलत होते. डिजीटल व्यवस्था कुठे आहे? वाहतूक व्यवस्थापनासाठी ड्रोनचा वापर का केला जात नाही? तिथे पाणी नाही, अन्न नाही आणि कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. आता आपण ऐकतोय की डिझेल आणि पेट्रोल संपत चालले आहे, इथे येणाऱ्या लोकांसाठी ही एक समस्या आहे. अशा समस्यांही त्यांनी मांडल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर… राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर…
शिवसेना सोडून राज ठाकरे सोडून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. ठाकरे कुटुंबातील सदस्य बाहेर...
तो मी नव्हेच…इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणात काय खुलासा, कॉल रेकॉर्डिंगमध्ये मुख्यमंत्र्यानाही ओढले
लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट, काय आहे नेमकं कारण?
“अनुषामुळे मनीष मल्होत्राच्या पार्टीत गेलो, ती इंडस्ट्री..”; मराठी अभिनेता भूषण प्रधानने सांगितला बॉलिवूड पार्टीचा अनुभव
लग्न म्हणजे काय? जिनिलियाला रितेशने दिलेलं उत्तर पाहून नेटकरी म्हणाले ‘तुम्हाला पण त्रास..’
प्रिती झिंटाचं 10 – 12 नाही तर, इतक्या कोटींचं कर्ज माफ? अभिनेत्रीने सोडलं मौन, सांगितलं संपूर्ण सत्य
नीतू कपूर यांना नातीने ढकललं? व्हायरल व्हिडीओवर रणबीरच्या बहिणीने सोडलं मौन, म्हणाली “ती बिचारी..”