शिरपूरच्या आंबा गावात तीन एकरवर गांजाची शेती, अकरा हजार किलो गांजा जप्त

शिरपूरच्या आंबा गावात तीन एकरवर गांजाची शेती, अकरा हजार किलो गांजा जप्त

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आंबा गाव शिवारात पोलिसांनी तीन एकर क्षेत्रावरील गांजा शेती उद्ध्वस्त केली. दोन दिवसांच्या कारवाईत अकरा हजार किलो गांजा हस्तगत केला आहे.

महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर शिरपूर तालुक्यात आंबा हे गाव आहे. येथील शिवारात एकाने मका व दादरच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने शिरपूर तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या शेतात धाड टाकली. तब्बल तीन एकर शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळले. शनिवार व रविवार असे दोन दिवस गांजाची कापणी करण्यात आली. अकरा हजार किलो वजनाचा दोन कोटी वीस हजार रुपये पिंमतीचा गांजा जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.

वीस एकरवर लागवडीचा संशय

मध्य प्रदेश सीमेवर हे गाव असल्याने येथून मोठय़ा प्रमाणात सतत गांजा तस्करी होते. आंबा गावच्या या शिवारात वीस एकरहून अधिक क्षेत्रावर गांजाची लागवड असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मर्सिडीजच्या आरोपावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, नीलम गोऱ्हेंची कुंडली मांडली; म्हणाले मूर्खपणाचे… मर्सिडीजच्या आरोपावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, नीलम गोऱ्हेंची कुंडली मांडली; म्हणाले मूर्खपणाचे…
दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला, यावरून आता राजकारण...
नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बसेससाठी नवे धोरण लागू होणार, पाहा काय योजना
गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर, साहित्यिकांचेही टोचले कान
‘उमेदवारीसाठी सुषमा अंधारेंनी दोन कोटी घेतले’; शिवसेनेच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
‘उतेकरांनी शहाणपणा शिकवायचा नाही…’; संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘छावा’मधील ‘तो’ सीन काढून टाकण्याची मागणी
…तर ‘छावा’मधून कमावलेला पैसा सामाजिक कार्याला वाहून द्यावा; शिर्के कुटुंबीयांचे उतेकरांना आवाहन
भयंकर! ट्रकचा टायर फुटला अन् रिक्षाच्या चिंधड्या झाल्या, व्हिडीओ व्हायरल