वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं….

वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं….

राज्यात लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र नितेश राणे यांच्या या मागणीला विरोध होत आहे.  तसेच राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे, या दोन्ही विषयांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. ते श्रीगोंदा येथे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

जिहाद्यांचा या उन्माद आहे, त्यामुळे हिंदू समाजातील लोकांना धीर देण्यासाठी ताकद देण्यासाठी मी इथं आलो आहे. हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे,  हिंदूंच्या ताकदीने हे सरकार स्थापन झालं आहे. या सरकारच्या काळात हिंदुवर झालेला अन्याय सहन करणार नाही, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.  दरम्यान सध्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी म्हटलं की,  ‘पीर बाबाची नाटकं कशाला पाहिजेत? पैगंबर यांना मानणारा मुळ मुस्लिम जमाज देखील पीर बाबाला मानतो का? वक्फ बोर्डाचा विषय आमच्याकडे आहे. ही आमची राज्य सरकार व केंद्र सरकारची भूमिका आहे’, असं राणे यांनी म्हटलं आहे.

लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र या मागणीला विरोध होत आहे, यावर देखील नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र दिलं आहे.
सरकार आमचं आहे, सरकारचा मी प्रतिनिधी आहे. आमचा कारभार हा पारदर्शक व्हावा असा आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. बांगलादेशी कीड देशात ठेवणार नाही, त्यांना जे दूध पाजणारे आहेत, त्यांनाही आम्ही ठेचू असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका
MNS Raj Thackeray: राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत मुंबई शहरातील दोन महत्वाच्या प्रश्नांवर राज...
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, विकिपीडियाची आता बोबडी वळली, सायबर पोलिसांनी अशी काढली खुमखुमी
मोठी बातमी! ‘तुझे तुकडे तुकडे करू तूला…’, भाजप नेत्याला धमकीचं पत्र
‘छावा’मुळे चर्चेत असलेल्या रश्मिकाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, 5 महागड्या गाड्या, जाणून घ्या नेटवर्थ
प्रियांका चोप्राने एअरपोर्टवर चाहत्यांची माफी का मागितली? नेटकऱ्यांकडून कौतुक
शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज; ‘छावा’मध्ये औरंगजेबाला ठणकावून सांगणारा तो बालकलाकार कोण?
अखेर ‘या’ तारखेला प्राजक्ता अडकणार विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव