लवकरच देशातले टोलनाके हटणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
देशात लवकरच टोलसाठी एक नवीन धोरण लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या 10-15 दिवसात हे धोरण लागू होईल. काही दिवसांत संपूर्ण देशभरातील सर्व टोल प्लाझा हटवले जातील असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, देशभरातील सर्व टोल नाके हटवले जातील. याबाबत गडकरी यांनी फार काही सांगण्यास नकार दिला. परंतु पुढील 10 ते 15 दिवसांत देशात नवीन टोल धोरण लागू होईल अशी माहिती दिली.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गडकरी म्हणाले की नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सॅटेलाईट ट्रॅकिंगनुसार आपोआप टोल कापला जाईल. सॅटेलाईट ट्रॅकिंगच्या माध्यमातून गाडीच्या क्रमांकाची ओळख पटवली जाईल, त्यानंतर हा टोल आपोआप कट होईल असे गडकरी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List