बांगलादेशच्या वाघांना टीम इंडिया करणार चितपट! 15 दिवसांत 6 सामने होणार, वेळापत्रक जाहीर

बांगलादेशच्या वाघांना टीम इंडिया करणार चितपट! 15 दिवसांत 6 सामने होणार, वेळापत्रक जाहीर

टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 15 दिवसांत 6 सामन्यांचा थरार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये प्रथम वनडे मालिका आणि त्यानंतर टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 17 ऑगस्ट रोजी पहिला वनडे सामना आणि 20 ऑगस्ट रोजी दुसरा वनडे सामना मीरपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तीसरा वनडे सामना 23 ऑगस्ट रोजी चटगांवमध्ये खेळला जाईल. वनडे मालिका समाप्त झाल्यानंतर 26 ऑगस्टपासून टी-20 मालिकेचा थरार चटगांव येथून सुरू होईल. त्याचबरोबर मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 29 आणि 31 ऑगस्ट रोजी मीरपूरमध्ये खेळला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News