राज कुमार यांनी हत्या का केली? जुहू बीचवर मुलीसोबत काय घडलं? अभिनेत्याने रागाच्या भरात केली हत्या

राज कुमार यांनी हत्या का केली? जुहू बीचवर मुलीसोबत काय घडलं? अभिनेत्याने रागाच्या भरात केली हत्या

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी एका मुलाखतीत दिग्गज अभिनेते राज कुमार यांच्याबद्दल काही मनोरंजक खुलासे केले आहेत. रझा मुराद यांनी सांगितले की, एकदा रागाच्या भरात राज कुमारने एका व्यक्तीला एवढी मारहाण केली होती की त्याचा मृत्यू झाला होता. या हत्येनंतर राज कुमार यांच्यावरील खटला अनेक महिने प्रलंबित होता आणि त्यांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या होत्या. मात्र, अखेर या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता नेमकं हे प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…

नेमकं काय झालं?

रझा मुराद यांनी यांनी नुकतीच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत रझा मुराद यांनी राज कुमार यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, “ते माझे वडील मुराद साहेबांचे खूप चांगले मित्र होते. एकदा ते एका मित्र आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत जुहू बीचवर गेले होते. तिथल्या महिलेवर कोणीतरी असभ्य कमेंट केली होती. राज साहेबांना ते पाहून राग आला आणि राज साहेबांनी त्या व्यक्तीला इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला होता. राज साहेबांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.”

वाचा: ‘मी गुंड असतो तर बरं झालं असतं’, सलमानच्या सिकंदरमुळे मराठी सिनेमा हटवल्यामुळे अभिनेता संतापला

निर्दोष सुटका झाली

रझा मुराद पुढे म्हणाले, “माझे वालिद साहब राज कुमार यांचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे ते प्रत्येक कोर्टाच्या सुनावणीला जायचे, ते खूप चांगले मित्र होते. हा खटला अनेक महिने चालला आणि नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली. जेव्हा त्यांची निर्दोष मुक्तता झाली तेव्हा वालिद साहब मुलांसह त्यांच्या घरी गेले होते.”

रझा मुराद यांनी सांगितले की, राज कुमार यांचे जुहू येथे एक कॉटेज होते. रझा मुरादचे वडील मुराद यांनी राज कुमारसाठी फुलांचा हार घेतला होता जेणेकरुन केस जिंकल्याचा आनंद साजरा करता येईल. रझा मुराद यांनी सांगतले की, “जेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो तेव्हा माझ्या हातात हार घालण्यासाठी दिला. आणि मी असे जे पाहिले (डोके वर करून), मला वाटले की मी कुतुबमिनारकडे पाहत आहे. तो थोडा खाली वाकला. मग मी त्याला हार घातला.”

रझा मुराद यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांच्यावर खुनाचा खटला सुरु होता, त्यावेळी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. मेहनत करत होते. ते म्हणाला, “तो चित्रपट बनवत होता. तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये होता. ही घटना मदर इंडिया सिनेमाच्या आधीची आहे. त्यावेळी, तो असा अभिनेता होता, ज्याला सर्वजण ओळखत होते. त्याचे अनेक चित्रपट आले होते.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार
अनेक रेशनधारक अपात्र, दुबार तसेच स्थलांतरित असतानाही रेशनिंगच्या धान्यावर डल्ला मारतात. इतकेच नाही तर व्यक्ती मृत झाल्यावरही त्याचे नाव रेशनकार्डवरून...
मरणानंतरही वासिंदचा प्रवीण जिवंत राहणार, मेंदूत रक्तस्राव झालेल्या प्रवीण चन्नेचे अवयव दान; अनेकांना मिळणार नवे आयुष्य
सोसायटीची जागा हडपणाऱ्या विरारच्या बिल्डरला दणका, गृहनिर्माण संस्थेच्या ‘मानीव अभिहस्तांतरणा’स मंजुरी
शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके, अहिल्यानगर झेडपीची 23 लाख पुस्तकांची मागणी
शॉवरखाली अंघोळ नको; आठवड्यातून एकदाच कपडे धुवा ! पाणी बचतीसाठी ठाणे महापालिकेचा फॉर्म्युला
Pune crime news – नकली पिस्तूल दाखवून ज्वेलर्स शॉप लुटले, 20 ते 25 तोळ्यांचे दागिने लांबविले
पोलीस डायरी – मास्टर माइंड हेडलीच! राणा हा फुटकळ कच्चा लिंबू !