Jalna news – मध्यरात्री वाळूचा टिप्पर घरावर ओतला, साखरझोपेत असलेल्या 5 जणांचा वाळू खाली दबून मृत्यू

Jalna news – मध्यरात्री वाळूचा टिप्पर घरावर ओतला, साखरझोपेत असलेल्या 5 जणांचा वाळू खाली दबून मृत्यू

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या भागात सुरू असलेल्या पुलाचा बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचा टिप्पर खाली करण्यात आला. यामुळे वाळू खाली दबून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, पासोडी शिवारामध्ये पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाच्या जवळच कामासाठी आलेल्या मजुरांची पत्र्याचे शेड उभारले आहेत. याच शेडमध्ये धनवई कुटुंब झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर शेडवर रिता केला. त्यामुळे शेडमध्ये झोपलेले सहा जण वाळू खाली दबले गेले. शेड बाहेर झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरडा केला.

महिलेने आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून आणले. त्यांनी वाळूचा ढिगारा हटवत सहा जणांना बाहेर काढले. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला होता, तर एक 12 वर्षांच्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे.

गणेश काशिनाथ धनवई (वय – 50, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), भूषण गणेश धनवई (वय – 17, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), राजेंद्र दगडूबा वाघ (वय – 40, रा. दहिद, ता. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (वय – 20, रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना), सुपडू आहेर, (वय – 38, रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक आहेत.

पासोडी शिवारामध्ये पुलाचे काम सुरू असून रवींद्र आनंद हा ठेकेदार आहे. या ठिकाणी कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी म्हणून ठेकेदार रात्रीच्या सुमारास अवैध वाळू आणून टाकत होता. ठेकेदार आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. तसेच महसूल विभागालाही पाचारण करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आश्रम’मधला खलनायक ‘भोपा स्वामी’चे महाकुंभ स्नान; म्हणाला “सर्व देवाच्या इच्छेने…” ‘आश्रम’मधला खलनायक ‘भोपा स्वामी’चे महाकुंभ स्नान; म्हणाला “सर्व देवाच्या इच्छेने…”
‘आश्रम’ या वेब सीरीजचा नवीन भाग आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या भागात आता काय नवीन पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना...
“महाराजांबद्दलचे गढूळ लिखाण पुसायचं होतं?”, शिर्केंच्या वंशांच्या आक्षेपानंतर ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची माफी
Pune News – इंदापूरात पोलिसांची धडक कारवाई, 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत
Mumbai fire news – मुंबई एअरपोर्ट जवळील फाईव्ह स्टार हॉटेलला आग, अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल
माजी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती; निवृत्तीनंतर मिळाली मोठी जबाबदारी
Video – धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर पहिल्यांदाच मस्साजोगला पोहोचलेले सुरेश धस काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा