सोलापूरची विमानसेवा हवेतच; आणखीन तीन महिने वाट पाहा

सोलापूरची विमानसेवा हवेतच; आणखीन तीन महिने वाट पाहा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ऐरणीवर आलेली सोलापूरची विमानसेवा अद्यापही सुरू झालेली नाही. यासाठी आणखीन तीन महिने वाट पाहण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे. विमानसेवेबाबत अधिकारी व विमानसेवा कंपन्यांची मंगळवारी बैठक झाली. राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने 30 जानेवारी रोजी सोलापूर-मुंबई, सोलापूर-गोवा मार्गासाठी निविदा जाहीर केली आहे.

सोलापुरात विमानतळाची सुविधा असूनही विमानसेवा सुरू नसल्याने अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विमान सेवेवरून सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप होत असताना, पंतप्रधान मोदी यांनी विमानतळ उद्घाटनाचा घाट घातला. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डिसेंबरमध्ये विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा केली. परंतु अद्यापही विमानसेवा सुरू नसल्याने सोलापूरकर विमानसेवेबाबत गमतीची भाषा करीत आहेत.

यापूर्वी सोलापूर-मुंबई व सोलापूर-गोवाकरिता 42 सीटरच्या एअर क्राफ्ट विमानसेवेला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) परवागी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानसेवेसाठी 30 जानेवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली; परंतु काही विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी आक्षेप घेत 42 ऐवजी 72 एअरक्रॉप्ट विमानसेवेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. याबाबत अधिकारी आणि विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होऊन अधिकाऱ्यांनी 72 एअरक्रॉफ्ट विमानसेवा अनुकुलता दर्शविल्याचे सांगण्यात येते. 15 मार्चपर्यंत निविदेची अंतिम मुदत असून, त्यानंतर लिलाव होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये सुरू होणारी विमानसेवा मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे सोलापूरची विमानसेवा आणखीन तीन महिने हवेत राहणार असल्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे....
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर
मोठी बातमी! घोषणा देत तरुणाची मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी
‘त्यांचा घटस्फोट…’, मामा गोविंदाच्या डिव्होर्सवर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया
नागीन 7 : या पाच नायिका एकता कपूर यांच्या नव्या “नागीन” च्या शर्यतीत
37 वर्षांनी गोविंदा आणि सुनीताचा होणार ‘ग्रे डिव्होर्स?’ नक्की काय आहे संकल्पना वाचा
“देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नाही, दिशाभूल का करता?”; त्र्यंबकेश्वर येथे नृत्य करण्यास मनाई करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर