रत्नागिरी स्थानकाजवळ पॅसेंजर रेल्वेगाडीत तरूणीचा विनयभंग; संशयिताला अटक

रत्नागिरी स्थानकाजवळ पॅसेंजर रेल्वेगाडीत तरूणीचा विनयभंग; संशयिताला अटक

उच्च शिक्षणासाठी कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले आहे.

उच्च शिक्षण घेणारी तरुणी कॉलेजचा फॉर्म भरण्याकरीता रत्नागिरीतून खेडकडे निघाली होती. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पहाटे सुटणाऱ्या रत्नागिरी – दिवा पॅसेंजर गाडीत ती बसली होती. यावेळी पाठीमागून एका अनोळखी तरुणाने तिची मान आवळली व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिथून धूम ठोकली. नंतर या तरुणीने स्वतःला सावरत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ट्रेनच्या दरवाजातून खाली उडी मारली व दगडफेक करू लागला. अंधाराचा फायदा घेत तो तरुण पळून गेला.

या घडलेल्या प्रकारमुळे घाबरलेल्या तरुणीने रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने सर्व घटना पोलीस अधिकारी सतीश विधाते यांच्या कानावर घातली. विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच रेल्वे पोलिसांनी सूत्र हलविली आणि त्या तरुणाचा माग काढण्यास सुरवात केली. दोन तासाच्या आत त्या संशयित तरुणाला रेल्वे पोलीस आणि चिपळूण पोलिसांच्या संयुक्त टीमने चिपळूण येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर या तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुढील तपास पोलीस करत आहेत. रत्नागिरी सारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते....
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती
झोपण्यापूर्वी हे पाणी प्या… चमत्कारीक फायदे ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल; वस्तू छोटी पण…
IND Vs PAK – टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 6 गडी राखून दणदणीत विजय
राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल; विद्यार्थ्यांवर अन्याय?