देशातील निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड चिंताजनक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे परखड मत

देशातील निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड चिंताजनक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे परखड मत

देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा होत असलेला प्रयत्न किंवा छेडछाड ही अत्यंत चिंताजनक बाब असून, न्यायपालिकेचा वापर एखाद्या शस्त्रासारखा होत आहे. हे जगात कुठल्याही देशात घडत नाही, असे परखड मत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मांडले. महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अचानक वाढलेल्या मतदानावरून सुरू असलेला गदारोळ आणि उघड झालेल्या ईव्हीएम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर धनखड यांचे मत अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

हावेरी जिल्ह्यातील रानेबेन्चुर येथे कर्नाटक विभव लेक्चर अँड कल्चरल फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. देशभरात निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकून संपूर्ण प्रक्रियेशी छेडछाड केली जात आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. देशात पूर्वीची म्हणजेच जुनी लोकशाही ही अधिक मजबूत, पुरोगामी आणि जिवंत लोकशाही होती. गाव, शहर, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर घटनात्मकदृष्ट्या अत्यंत मजबूत लोकशाही जगात केवळ आपल्याच देशात होती. कारण, त्यावेळी निवडणूक प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकला जात नव्हता. मात्र, आता निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड केली जात आहे, असा आरोप जगदीप धनखड यांनी केला. राष्ट्रविरोधी कारवायांसाठी पैशांचा वापर विविधप्रकारे विविध स्तरांवर फूट पाडली जात आहे. त्यासाठी अनेक मुद्द्यांवर नवनव्या मार्गाचा वापर केला जात असून, न्यायपालिकेचा वापर केला जात आहे, असा आरोप धनखड यांनी केला. घटनेने प्रत्येकाला न्याय मागण्याचा हक्क दिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांत राष्ट्रविरोधी कारवायांसाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी पैशांचा वापर केला जात आहे. तसेच न्यायपालिकेचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे. असे इतर कुठल्याही देशात घडत नाही, असा दावाही धनखड यांनी केला.

देशापुढे राष्ट्रवाद आणि प्रादेशिक वादाचे आव्हान

देशापुढे सध्या राष्ट्रवाद आणि प्रादेशिक वादाचे आव्हान आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून प्रचंड वाद होत आहेत. या माध्यमातून देशातील सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही धनखड यांनी केला. देशाची प्रगती जेव्हा मी जगाच्या नजरेतून बघतो, तेव्हा आपल्या देशातील लोक मला पावसात नाचणाऱ्या मोराच्या पिसासारखे वाटतात. परंतु मोराच्या पायाकडे पाहिले तर काळजी वाटते. कारण, देशाला सांस्कृतिक तत्त्वज्ञानाची गरज आहे. आपण आपली भरभराटीची तीच शाखा कापतो आहोत, ज्यावर आपण बसलो आहोत, असेही ते म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या, राज्यपालाकडे कुणी केली मागणी ? युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या, राज्यपालाकडे कुणी केली मागणी ?
युट्युबर रणवीर अलाहाबादिया याने समय रैना याच्या इंडियाज गॉट लेटेंट ( Indias Got Latent ) या ब्लॅक कॉमेडी शोमध्ये पालकांविषयी...
‘एकनाथ शिंदे डॉक्टर ते ऑपरेशन कसं करतात हे राऊतांना माहितीये’ शिवसेनेच्या नेत्याचा खोचक टोला
कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या बसेसबाबत महामंडळाचा मोठा निर्णय, काय झाले पाहा ?
11 दिवसांत 47 चित्रपट साइन करणारा अभिनेता, ज्याच्या एका चुकीमुळे शाहरुख खान बनला रातोरात स्टार, अभिनेत्याला आजही पश्चाताप
दररोज थोडं थोडं डार्क चॉकलेट खाल्लं तर? फायदे जाणून विश्वास बसणार नाही; लगेचच डाएटमध्ये समावेश कराल
हेच काय गुजरात मॉडेल? राज्यावर 3.77 लाख कोटींचा कर्जाचा बोजा; दरडोई 66 हजारांचा भार
Ratnagiri News – लोटे वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्समध्ये वायू गळती, एका कामगाराला गॅसची बाधा