तिरुपती लाडू वाद – आता लाडूत सापडले गुटख्याचे पाकिट, मंदिरात गेलेल्या भक्ताचा दावा

तिरुपती लाडू वाद –  आता लाडूत सापडले गुटख्याचे पाकिट, मंदिरात गेलेल्या भक्ताचा दावा

तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याचा वाद पेटला असताना आता आणखी एक घटना समोर आली आहे. एका भक्ताने तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या डब्ब्यात गुटख्याचे पाकिट सापडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून हा वाद आणखी वाढणार आहे.

तेलुगु वेबसाईट, ‘समायम’, इंडिया टुडे आणि डेक्कन क्रॉनिकलने या संदर्भात वृत्त दिले आहे. त्याच्यानुसार 19 सप्टेंबर रोजी तेलंगणच्या खम्मम जिल्ह्यातून दोन्टू पद्मावती नावाची महिला तिरुपतीच्या मंदिरात गेली होती. तिथे त्यांनी दर्शन घेतेले आणि त्यानंतर प्रसाद घेतला. आता त्या प्रसादाबाबत दावा करण्यात आला आहे. महिलेने घेतलेला प्रसादाचा डबा घरी येऊन उघला असता त्यात गुटख्याचे पाकिट सापडले आहे. शिवाय त्या प्रसादातही गटख्याचे काही अंश मिळाले आहेत. आता सोशल मीडियावर त्या प्रसादाचे फोटो व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या कॉमेंट येत आहेत.

तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून वाद पेटलेला आहे. या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आणि एकच खळबळ उडाली.

वास्तविक, तिरुमला तिरुपती देवस्थानाने लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपाची चाचणी करून घेतली होती. त्यांच्या वतीने हे तूप गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेत (NDDB CALF Ltd.) पाठवण्यात आले. तुपाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले तेव्हा 9 जुलै ही तारीख होती. त्या तपासणीचा अहवाल 16 जुलै रोजी आला. त्यात तूप योग्य नसल्याचे सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात