मुंबईती पावसाची हजेरी, मध्य रेल्वेचा वेग मंदावला; चाकरमान्यांचा खोळंबा
राज्यासह मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात रात्रीपासूनच पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. पावसाच्या हजेरीमुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला असून आज पुन्हा लेटमार्क लागण्याची चिंता चाकरमान्यांना आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने या भागात वेगमर्यादेमुळे पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला होता. आता हे काम पूर्ण होत आले आहे. तरीही वेगमर्यादेमुळे पश्चिम रेल्वे 5 मिनिटांच्या विलंबाने धावत आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशीराने धावत आहे. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने गाड्या पुन्हा वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List