डरपोक सरकार सिनेटच्या निवडणुकीलाही घाबरतंय; आदित्य ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल

डरपोक सरकार सिनेटच्या निवडणुकीलाही घाबरतंय; आदित्य ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक चर्चेत होती. निवडणुकीच्या अवघ्या 24 तास आधी ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. तसेच ही निवडणूक टाळण्यासाठी मिंधे सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.राज्यात घटनाबाह्य आणि घाबरट मुख्यमंत्री आहेत. त्यांना सिनेट निवडणूक आणि युवासेनेची प्रचंड भिती वाटत आहे. त्यामुळे ही निवडणूक होऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आज होत असलेल्या मतदानासाठी आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाचे आभार मानले. मिंध्यांना सुशिक्षित मतदारांची भिती वाटत आहे. डरपोक सरकार सिनेट निवडणुकीलाही घाबरत आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचे सर्व मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात