नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात

नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात

मुलांमध्ये मोबईलची क्रेझ चांगलीच पहायला मिळते. त्यामुळे प्रत्येकालाच नवीन मोबाईल घेतल्यावर आनंद होतो. मात्र एका 16 वर्षीय मुलाच्या नवीन मोबाईल घेताल म्हणून जीव गमवावा लागला आहे. नवीन मोबाईल घेतल्याची पार्टी दिली नाही म्हणून त्याच्याच मित्रांनी त्याचा खून केला आहे.

राजधानी दिल्लीमधील शकरपूरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. 16 वर्षीय सचिनने नवीन मोबाईल खरेदी केला होता. 23 सप्टेंबरला सायंकाळी मोबाईल खरेदी करून तो त्याच्या एका मित्रासोबत घरी निघाला होता. त्यावेळी वाटेत असणाऱ्या एका दुकानात त्याचे काही मित्र त्याला भेटले. सचिनचा नवीन मोबाईल पाहिल्यावर त्यांनी त्याच्याकडे पार्टीचा तगादा लावला. मात्र सचिनने पार्टी देण्यास नकार दिला. यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाच रुपांतर हाणामारीत झालं. त्याचवेळी एकाने चाकू काढला आणि सचिनला दोन वेळा भोसकलं.

सचिनला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात