जंक फूड खाण्यापासून व्हा सावधान, विचारक्षमता कमी होण्याची भीती!

जंक फूड खाण्यापासून व्हा सावधान, विचारक्षमता कमी होण्याची भीती!

बऱ्याच जंक फूड आणि पॅकेज फूड खाण्यात स्मृतीभ्रंश होणारे घटक असतात. ज्यामुळे गंभीर धोका होऊ शकतो. यामध्ये विचारक्षमता कमी होण्याची शक्यता असते. आणि त्यामध्ये स्ट्रोक चा धोका जास्त प्रमाणात होतो. जर तुम्ही रोज जंक फूड खात असाल तर आजपासूनच खाणे बंद करा. कारण आरोग्यासोबतच ते तुमचे वय आणि सौंदर्यालाही हानी पोहोचवत आहेत. यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

पिझ्झा, बर्गर, फ्राईज, पॅक्ड चिप्स, रेड मीट, बेकन, हॉट डॉग आणि सॉसेज यांसारखे पदार्थ खाणाऱ्यांसाठी चेतावणी देण्यात आली आहे. अशा लोकांच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.अलीकडेच अमेरिकेतील अल्झायमर असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही एक संशोधन सादर करण्यात आले. 43 वर्षे चाललेल्या या संशोधनातून असे समोर आले आहे की जे लोक अतिप्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात खातात त्यांना स्मृतिभ्रंशाचा गंभीर धोका असतो. ज्यामध्ये स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो.

याआधीच्या संशोधनात लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहासाठी जंक फूड जबाबदार असल्याचे आढळून आले होते. मात्र, नव्या अभ्यासात याचा संबंध स्मरणशक्तीशी जोडण्यात आला आहे.

अतिप्रक्रिया केलेले अन्न ज्यामध्ये चव वाढवण्यासाठी प्रतिक्रिया केली जाते. अशा पदार्थांत फायबर, विटामिन्स आणि प्रोटिन, प्रथिने कमी प्रमाणात असतात. आणि साखर, सोडीअम अशा लठ्ठपणा, कोलेस्ट्रोल आणि ह्रदयाशी संबंधीत धोका वाढवणारे घटक असतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात