1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानचा होता सहभाग, 25 वर्षानंतर दिली कबुली

1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानचा होता सहभाग, 25 वर्षानंतर दिली कबुली

1999 साली हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होते. या या युद्धात आपलाही सहभाग होता अशी जाहीर कबुली पाकिस्तानने पहिल्यांदा २५ वर्षात दिली आहे. शुक्रवारी पाकिस्तानात संरक्षण दिवस साजरा केला गेला. तेव्हा सैन्य प्रमुख असीम मुनीर यांनी भाषणात म्हटलं की हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान 1948, 1965, 1971, कारगिल आणि सियाचीनमध्ये झालेल्या संघर्षात हजारो लोकांनी आपले बलिदान दिले आहे.

1999 साली मे आणि जून दरम्यान कारगिलमध्ये हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान युद्ध झालं होतं. पाकिस्तानी सैन्याने जम्मू कश्मीरमधल्या कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. हिंदुस्थानने .घुसखोरांना पळवून लावलं होतं.

तेव्हा पाकिस्ताने हे सैनिक आपले असल्याचा इन्कार केला होता. हे लोक स्वतंत्र काश्मीरसाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक असल्याचे म्हटले होते. इतकंच नाही तर कारगिलमधील घुसखोरीचाही त्यांनी दावा फेटाळला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली
गुरुवारी मध्यरात्री एक वाजता कारने आलेल्या व्यक्तीने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी टाकल्याची घटना घडली. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास...
मुंबईतील महत्वाच्या घडामोडी
शिताफीने मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश
कर्नाटकातील तरुणाची मुंबईत येऊन जबरी चोरी, पोलिसांनी तीन तासांत पकडले
नागपूरमधील अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळल्या, शिवसेनेच्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणा हादरली
मंत्रालयावर धडक देण्यासाठी मराठा आंदोलक पोहचले मुंबईत, आझाद मैदानाबाहेर दिला ठिय्या
रखडलेले 17 एसआरए प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार, हजारो कुटुंबियांना मिळणार दिलासा