वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली

वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली

गुरुवारी मध्यरात्री एक वाजता कारने आलेल्या व्यक्तीने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी टाकल्याची घटना घडली. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. अल्ताफ मोहम्मद हुसेन असे त्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो गोवंडी येथे राहत होता. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अल्ताफ कार घेऊन वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आला. तेथे एका बाजूला कार उभी करून अल्ताफ बाहेर आला आणि थेट समुद्रात उडी टाकली.

ही माहिती मिळताच वरळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी वरळी अग्निशमन दल व वांद्रे अग्निशमन दलाला बोलवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यामध्ये बॅटरीच्या सहाय्याने शोध घेतला, परंतु काळोख व भरती असल्याने त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. दरम्यान आज सकाळी अल्ताफचा मृतदेह दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्रकिनारी सापडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत! गडकरींनी कान टोचले राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत! गडकरींनी कान टोचले
लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कुणी विचार मांडले तरीही राजाने ते सहन...
साहित्य जगत- मराठी नाटय़सृष्टीतील रागरंग
कथा एका चवीची- आनंदाचा सदिच्छा दूत
जागर- लांडगा आला रे आला…
सत्याचा शोध- आक्रोशाची कविता!
प्लेलिस्ट- आत्मीय सुरांचे सोबती
रंगभूमी- सादरीकरणातील सौंदर्य