Ind Vs Ban 1st Test – तिसऱ्या दिवशी पंत आणि गिलचा धमाका, टीम इंडियाला जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज

Ind Vs Ban 1st Test – तिसऱ्या दिवशी पंत आणि गिलचा धमाका, टीम इंडियाला जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि शुभमन गिलने धमाकेदार शतक झळकावले. त्यामुळे टीम इंडियाने बांगलादेशला 515 धावांचे आव्हान दिले आहे. आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशने चार विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत.

चेन्नईच्या MA Chidambaram Stadium येथे टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यातील आज झालेल्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून शुभमन गिल (119 धावा) आणि ऋषभ पंत (109 धावा) यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने 515 धावांची आघाडी घेत आपला दुसरा डाव 287 या धावसंख्येवर घोषित केला.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी करत चांगली सुरुवात केली. मात्र टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने झाकीर हसन (33 धावा) याला बाद करत बांगलादेशला पहिला हादरा दिला. त्यानंतर शादमान इस्लाम (35 धावा), मोमिनुल हक (13 धावा) आणि मुशफीकर रहिम (13 धावा) या तिघांना रविचंद्रन अश्विनने तंबुचा रस्ता दाखवला. मात्र नजमुल हुसेन शांतो याने अर्धशतकीय पारी खेळत संघाचा डाव सावरला आहे. तिसऱ्या दिवसा अखेर बांगलादेशने चार विकेट गमावत 158 धावा केल्या असून नाजमुल हुसेन शांतो (51 धावा) आणि शाकिब अल हसन (5 धावा) नाबाद आहेत. बांगलादेशला जिंकण्यासाठी 357 धावांची गरज आहे, तर टीम इंडियाला जिंकण्यासाठी सहा विकेटची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलण्यावरुन मुंबई हायकोर्टानं सरकारला दणका दिलाय. उद्या होऊ घातलेली निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकल्यामुळे ठाकरे गटाच्या...
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मुस्लिम लांगुलचालनाची दवाब मान्य नाही, शाब्दिक चकमक, पाहा Video
धारावीत ‘मशिदी’वरुन तणाव, नितेश राणे यांची टीका
डीपी जळाली की इंजिनियरला हजार रुपये द्यायचे, तीन पिढ्यांपासून वीज बिल भरत नाही! मोदींच्या मंत्र्याने दिली वीजचोरीची जाहीर कबुली
जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?