एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती, 30 सप्टेंबरपासून कार्यभार सांभाळणार

एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती, 30 सप्टेंबरपासून कार्यभार सांभाळणार

एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपासून अमर प्रीत सिंग पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. यानंतर अमर प्रीत सिंग पदाचा कार्यभार स्वीकारतील. अमर प्रीत सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत.

अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला होता. त्यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी हिंदुस्थानी हवाई दलाचे 47 वे उपप्रमुख पद स्वीकारले होते.

हवाई दलाचे पहिले प्रमुख कोण?

देशाच्या स्वातंत्र्यानंतर एअर मार्शल अर्जन सिंग हे स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले एअर चीफ मार्शल बनले. 01 ऑगस्ट 1947 ते 21 फेब्रुवारी 1950 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. यानंतर ते हवाई दलाचे पहिले मार्शल बनले. 1 एप्रिल 1954 रोजी पहिले हिंदुस्थानी एअर मार्शल सुब्रत मुखर्जी यांनी हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय...
स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले
रजनीकांत यांनी केला थेट अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी…
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास
Nagar News – नगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा आरोप
भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना 10 हजार कोटीचा फटका, शंकरराव गडाख यांचा आरोप