राज्यात गुंतवणूक वाढल्याचा दावा करता, तर मग बेरोजगारी का वाढत आहे? काँग्रेसचा महायुती सरकारला सवाल

राज्यात गुंतवणूक वाढल्याचा दावा करता, तर मग बेरोजगारी का वाढत आहे? काँग्रेसचा महायुती सरकारला सवाल

राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकुल वातावरण आहे. जनतेचा महायुती सरकारवर प्रचंड रोष आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होईल, असा विश्वास काँग्रेसचे राज्यातील प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. हत्या, दरोडे, महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. पुण्यात तीन दिवसात दोन हत्या करण्यात आल्या. महागाई आवाक्याबाहेर गेल्याने सण साजरे करणे अवघड झाले आहे. जनता प्रचंड त्रस्त आहे पण महायुती सरकार मात्र घोटाळे करून पैसे वसुल करण्यात व्यस्त आहे. असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

राज्यात गुंतवणूक वाढली असा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे तर मग राज्यात बेरोजगारी का वाढत आहे? बेकारी कमी का होत नाही? याची उत्तरे फडणवीस यांनी द्यावीत. भाजप आणि फडणवीस सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. मराठवाडा व विदर्भात पुराने थैमान घातले असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही. महाराष्ट्रात मात्र अद्याप केंद्राचे पथकही आले नाही. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अजून मदत का मिळत नाही? महायुतीचे नेते केंद्राकडे मदत का मागत नाहीत? असा सवाल पटोले यांनी विचारले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या? “मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?
Varsha Gaikwad Appeal To Dharavi People : मुंबईतील धारावी परिसरात शनिवारी सकाळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. धारावी परिसरात असलेल्या एका...
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीचं विधानसभेशी कनेक्शन?; आदित्य ठाकरे यांचा आरोप काय?
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत
‘वंचित’ तिसऱ्या आघाडीत सामील होणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
Dharavi Mosque : धारावी मशीद प्रकरण, मशिदीचे विश्वस्त आणि आंदोलकांची परस्पर भिन्न भूमिका, पुढे काय?
Dharavi Mosque : ‘आत यश देणं अल्लाहच्या हाती’, पोलीस स्टेशन बाहेर आल्यानंतर तो नेता काय म्हणाला?
आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु