यावेळची हवा तशीच होती…लोकं म्हणायचे गुलाबराव गेले डब्ब्यात, पण… गुलाबराव पाटील निवडणुकीवर पहिल्यांदाच मनमोकळे बोलले

यावेळची हवा तशीच होती…लोकं म्हणायचे गुलाबराव गेले डब्ब्यात, पण… गुलाबराव पाटील निवडणुकीवर पहिल्यांदाच मनमोकळे बोलले

आपण निवडून येणार याची मलाही गॅरंटी नव्हती, पण लाडक्या बहिणीनी साथ दिल्याने आम्हाला मोठा आधार मिळाला आहे.सरकार देखील आता महिलांच्या पाठीशी उभे असून महिलांसाठी अनेक योजना सरकारने तयार केल्या आहेत. मला मंत्रीपद मिळेल की नाही याची देखील गॅरंटी नव्हती, पण सगळं झाले अशी तूफान फटकेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली आहे. किनगाव -जळगाव या मार्गावरील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

1500 रुपये पाहून आपलं बटण दाबलं

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की खरं सांगायला गेलं तर यावेची हवाच तशी होती….मलाही वाटायचं की आता माझंही खरं नाही..लोकही म्हणायचे की माझे काय खरं नाही.पुन्हा मी येत नाही. गुलाबराव पाटील गेला डब्यात. पण लोकांनी छप्पर फाडके मत दिली आपल्याला आणि निवडून दिला आपल्याला. खरं म्हणायला गेलं तर महायुती यावेळी एवढी घट्ट होती.. की त्याचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळाला. लाडकी बहीण जरी ती काँग्रेसची होती तरी तिने 1500 रुपये पाहून आपलं बटण दाबलं असेही त्यांनी सांगितले.

पण मी मंत्री झालो

यावेळची मतदानाची टक्केवारी जर बघितली तर महिलांनी आम्हाला खूप खूप मदत केली आहे. सरकार सुद्धा महिलांच्या पाठीशी उभे असून महिलांसाठी अनेक योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात तर 11 च्या 11 जागा या आपल्या निवडून आल्या आहेत. विरोधकांना बोहनीसुद्धा करता आलेली नाही. सांगायची गोष्ट झाली तर दोन्ही खासदार आपले. 11 चे11आमदार आपले. नशीब आपले बघा केंद्रात एक मंत्री आणि राज्यात तीन मंत्री आपले. तीन कॅबिनेट मंत्री एकाच वेळी आपल्या जळगाव जिल्ह्याला मिळाले आहेत. यावेळी मला मंत्रिपद मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती, कारण वाटा पाडणारे तीन आणि निवडून आलेले 237, पण मी मंत्री झालो असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मला माझ्या वडिलांसोबत काम करायचं नाही..” असं का म्हणाला होता अक्षय खन्ना? “मला माझ्या वडिलांसोबत काम करायचं नाही..” असं का म्हणाला होता अक्षय खन्ना?
अभिनेते विनोद खन्ना यांचं 27 एप्रिल 2017 मध्ये निधन झालं. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘अमर अकबर...
गर्लफ्रेंडला घेऊन पूर्व पत्नीच्या घरी पोहोचला आमिर खान; नेमकं काय शिजतंय?
‘गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते..’; पहलगाम हल्ल्यानंतर विशाखा सुभेदारकडून भावना व्यक्त
उष्णता वाढल्याने आठवडे बाजारात शुकशुकाट
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची आर्थिक लूट
Summer Tips- उन्हाळ्यात त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करुन बघा
Summer Tips- उन्हाळ्यात घरी गुलाबजल का असायला हवं! वाचा सविस्तर