कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा ते सांगा; संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा ते सांगा; संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

बुलढाण्यात कैसाल नागरे या तरुण शेतकऱ्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मुख्यमंत्र्यांना चार पानी पत्र लिहिले. त्याविषयी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

”कैलास यांच्या आत्महत्येविषयी सामनात आज अग्रलेख आहे. सामना हे एकमेव वृत्तपत्र आहे ज्याने या आत्महत्येवर अग्रलेख लिहला आहे. या सरकारने अद्याप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोंड उघडलेले नाही. हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे. हे सरकार विरोधकांवर बोलतील, राजकारणावर बोलतील पण शेतकऱ्यांवर बोलत नाही. ज्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला कृषी क्षेत्रातला पुरस्कार मिळाला होता. त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली. ही एका कैलासची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे. कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे, या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. सरकार काहीच करत नाही हे सरकार निक्कम आहे म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. लाज वाटत नाही या सरकारला. अजित पवार, एकनाथ शिंदे व मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी आपलाच जाहीरनामा परत वाचला पाहिजे व माफी मागितली पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.

”निवडणूकीत मतं मिळविण्यासाठी यांनी लाडकी बहिण योजनेचं 1500 रुपयाचं दुकान लावलं, शेतकऱ्यांना तीन लाखाची कर्जमाफी जाहीर केली. लाडकी बहिणचे 1500 चे जिंकून आलो तर 2100 करू सांगितले. मात्र प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. ना लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले, ना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. अनेक योजना बंद केल्या. आनंदाचा शिक्षा बंद केला. वर शेतकरी आत्महत्या करतोय त्यावर काही उपाययोजना नाही. सरकार कशाला चालवताय. कायद्याच्या दृष्टीने राज्यात हाहाकार माजला आहे. कुणाचा पायपूस कुणाच्या गळ्य़ात नाही. काल संपूर्ण सरकार रंग उधळण्यात व्यस्त होतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोंबिवलीत मध्यरात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला, अतिरिक्त फौजफाटा तैनात डोंबिवलीत मध्यरात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला, अतिरिक्त फौजफाटा तैनात
Dombivli Crime News: राज्यात शुक्रवारी सर्वत्र धुलिवंदन साजरी करण्यात आले. रंगाचा हा उत्सवात विविध रंगांनी राज्यातील नागरिक रंगले होते. हा...
‘त्या’ प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाकडून गंभीर दखल; सायबर गुन्हे शाखेत धाव
‘दादरला फर्स्ट क्लासमध्ये त्यानं माझ्या छातीला…’, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
आमिर खान 60 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, कोण आहे गौरी स्प्राट? जाणून घ्या
Ratnagiri News – राजापूरची शांतता आणि जातीय सलोखा राखणे आपली जबाबदारी, तहसीलदारांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक
‘न्यू इंडिया बँके’ अपहार प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला गुजरातमधून अटक
दिल्ली- गोवा गोमांस तस्करीचे पर्दाफाश; चिकन पार्सलच्या नावाखाली सुरू होते नेटवर्क