मराठवाड्याला पाणी देताना अटीमध्ये भेदभाव का? कैलास पाटील यांचा महायुती सरकारला सवाल

मराठवाड्याला पाणी देताना अटीमध्ये भेदभाव का? कैलास पाटील यांचा महायुती सरकारला सवाल

नार खोऱ्यातून पाणी वाटप करताना गिरणा प्रकल्पासाठी 350 तालांकची पण त्याच खोऱ्यातून मराठवाड्याला देताना ही अट 500 तालांक, असा भेदभाव का करण्यात आला? अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी महायुती सरकारला विचारला आहे.

विधानसभेत हा मुद्दा मांडताना कैलास पाटील म्हणाले की, “पार खोऱ्यात मराठवाड्यासाठी 183 द. ल. घ. मी एवढं पाणी नियोजित होते. मात्र हे पाणी देताना उंचीची अट घालून गिरणा प्रकल्पासाठी वेगळा न्याय तर मराठवाड्यासाठी वेगळा, असा प्रकार झाल्याने गोदावरी खोऱ्यासाठी फक्त 45.11 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. गिरणासाठी 350 तालांक एवढी अट ठेवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासाठी त्याच खोऱ्यातून पाणी उचलण्यासाठी अट 500 तालांकावर नेण्यात आल्याने गोदावरी खोऱ्यासाठी पाणी उपलब्धता कमी झाली आहे. ही बाब अन्यायकारक असून असा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पाटील पुढे म्हणाले, सध्या नार आणि पार खोऱ्यात शिल्लक असणारे 172 दलघमी हे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी कार्यवाही केली जाणार का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर जलसंपदा मंत्री\ राधाकृष्ण विखे पाटील यांनी असा भेदभाव झाल्याचे मान्य केला असून आता उंचीची अट शिथिल केली असल्याचे सांगितले. तसेच अशी विसंगती जाणीवपूर्वक केली असेल तर निश्चित अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी कैलास पाटील यांना दिले, अशी माहिती स्वतः कैलास पाटील यांनी X वर एक पोस्ट करत दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान
बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. मग त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असो वा त्यांच्या आगामी सिनेमांमुळे ते सतत चर्चेत...
सावळ्या रंगामुळे 1000 वेळा रिजेक्ट झाली; स्टारकिडशी लग्न, घर तोडल्याचा आरोप; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
रमजानच्या महिन्यात मुस्लिम अभिनेता पोहोचला तिरुपती मंदिरात, फोटो पाहून धर्म रक्षक संतापले
सलमान – अभिषेक नाही, ‘या’ श्रीमंत उद्योजकासोबत ऐश्वर्याला करायचं होतं लग्न, दोघांचे Unseen फोटो व्हायरल
घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली ‘आधी माझे…’
वयाच्या 7 व्या वर्षी घर सोडलं, कॉल सेंटरमध्ये काम केलं,अन् आज आहे इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक
आदर्श रस्त्यांमुळे पुणे सुसाट ! सोलापूर-नगर रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा