विमा घेणाऱ्यांना दिलासा नाहीच, 18 टक्के जीएसटी द्यावाच लागणार

विमा घेणाऱ्यांना दिलासा नाहीच, 18 टक्के जीएसटी द्यावाच लागणार

हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स घेणाऱ्यांना कुठलाही दिलासा सरकारने दिलेला नाही. यावर एक समिती गठित झाली असून नोव्हेंबरमध्ये यावर निर्णय होईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

दिल्लीत आज जीएसटीची बैठक पार पाडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात कॅन्सरच्या औषधांवर जीएसटी कमी करण्यात आला आहे. विम्यावर घेतल्या जाणाऱ्यावरही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. विम्यावर सरकार 18 टक्के जीएसटी आकारतं. विम्यावरचा जीएसटी माफ करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहून केली होती. यावर आज जीएसटीच्या बैठकीत चर्चा झाली. बिहारचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती ऑक्टोबर अखेपर्यंत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सीतारमण यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देव माफ करणार नाही… महिलेला निर्दयीपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला कोणी फटकारलं ? देव माफ करणार नाही… महिलेला निर्दयीपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला कोणी फटकारलं ?
राज्यात गेल्या काही महिन्यांत हिट अँड रनची अनेक प्रकरणे उघडकीस आली असून जुलै महिन्यात मुंबईतील वरळी येथे पहाटे एका आलिशान...
Badlapur Case: रिव्हॉल्व्हर हिसकावली त्यानंतर…, अक्षय शिंदे सोबत शेवटच्या 10 मिनिटांत नेमकं काय घडलं?
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा ऑफीसर कोण ? प्रदीप शर्मांसोबत केलंय काम
Badlapur Encounter : अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावरच का लागली गोळी? पोलिसांची बाजू तरी काय? नेमकं घडलं तरी काय
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण; नवी माहिती आली समोर
संस्थाचालकांना वाचवण्यासाठीच हे कथानक रचण्यात आलं; संजय राऊत यांचा मिंधे, फडणवीसांवर हल्लाबोल
खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी, माती उखडली; भिवंडीत ‘धुळ’वड