पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला; अखेर 14 महिन्यांनी हत्येचे रहस्य उलगडले

पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला; अखेर 14 महिन्यांनी हत्येचे रहस्य उलगडले

पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना कोपरगाव येथे उघडकीस आली आहे. तब्बल 14 महिन्यांनी हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. अभिजीत राजेंद्र सांबरे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर प्रमोद जालिंदर रणमाळे असे आरोपीचे नाव आहे.

अभिजीत सांबरे याचा 28 जून 2023 रोजी कोपरगाव येथे मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांनी सुरवातीला अकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र अभिजीतची त्याचा मित्र प्रमोदनेच हत्या घडवून आणल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता.

पोलिसांनी हत्येच्या अनुषंगाने प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रमोद ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

मयत अभिजीत हा 27 जून 203 रोजी नाशिक येथे आर्थिक व्यवहाराकरीता जाणार होता. यावेळी त्याने मित्र प्रमोदला सोबत येण्यास सांगितले. प्रमोद ठरल्याप्रमाणे अभिजीतला भेटला. त्यानंतर प्रमोदने अभिजीतच्या दारुचा व्यसनाचा फायदा घेत त्याला बीपी आणि झोपेच्या गोळ्या मिसळून भरपूर दारु पाजली. यानंतर त्याला दुचाकीवर बसवून कोपरगाव येथे घेऊन गेला. तेथे त्याला रस्त्यात टाकून पळ काढला.

अति मद्यसेवन तसेच बीपी आणि झोपेच्या अतिरिक्त गोळ्यांच्या सेवनामुळे अभिजीतचा मृत्यू झाला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली
गुरुवारी मध्यरात्री एक वाजता कारने आलेल्या व्यक्तीने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी टाकल्याची घटना घडली. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास...
मुंबईतील महत्वाच्या घडामोडी
शिताफीने मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश
कर्नाटकातील तरुणाची मुंबईत येऊन जबरी चोरी, पोलिसांनी तीन तासांत पकडले
नागपूरमधील अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळल्या, शिवसेनेच्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणा हादरली
मंत्रालयावर धडक देण्यासाठी मराठा आंदोलक पोहचले मुंबईत, आझाद मैदानाबाहेर दिला ठिय्या
रखडलेले 17 एसआरए प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार, हजारो कुटुंबियांना मिळणार दिलासा