आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?

आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?

राज्यात पुन्हा एकदा वारं पालटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी दोन्ही नेतृत्वाने एकत्र येण्याविषयी चाचपणी केली होती. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याविषयी त्यांनी मार्ग खुला असल्याचे मतं मांडलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अटी-शर्तींआधारे एकत्र येण्याची हाळ दिली. त्यानंतर याविषयी उद्धव ठाकरे गटाची भूमिका खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली.

अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेची मनसेविषयीची भूमिका काय यावर भाष्य केले. त्यांनी भाजपावर निशाणा साधताना मनसेसोबतच्या मनोमिलनावर कटाक्ष टाकला.

लोकसभा, विधानसभेवेळी आमची भूमिका होती. याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारे मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. ही भूमिका आमची आजही आहे. उद्धव ठाकरे यांनी नम्रपणे सांगितलं आहे, आजही अशा शक्ती आहेत, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थान सुरू आहेत. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही. अशी भूमिका घेणं सर्वांनी गरजेचं आहे. महाराष्ट्राचे शत्रू, शिवाजी महाराजांचे शत्रू, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे. त्यानंतर आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं म्हणणं सांगू, असे मत संजय राऊत यांनी मांडले.

महाराष्ट्राबाबत सध्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात एक. अशा महाराष्ट्र शत्रूंना घरात थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे. याच भूमिकेचा पुरस्कार राज ठाकरे किंवा त्यांच्या पदाधिकार्‍यांनी करायला पाहिजे. भाजपचे बगलबच्चे शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व नष्ट करायचं आहे. त्यांना ठाकरे या नावाचं अस्तित्वच मिटवायचं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सध्या वेट अँड वॉचची भूमिका

राज ठाकरे छत्रपती शिवरायांसमोर उद्धव ठाकरे यांच्या अटी आणि शर्तींच्या अनुषंगाने वचन देत असतील पुढील विचार करता येईल असे संकेत संजय राऊत यांनी दिले. जर दोन्ही प्रमुख ठाकऱ्यांनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करत आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतल्यावर आम्ही प्रतिक्षा करू. वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू, असे राऊतांनी स्पष्ट केले. आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्यांकडे पाहत आहोत. हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे, असे राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीचे 32 व्या वर्षी 20 वर्षाच्या अभिनेत्याशी लग्न; काही वर्षांतच घटस्फोट,घेतली कोटींची पोटगी अभिनेत्रीचे 32 व्या वर्षी 20 वर्षाच्या अभिनेत्याशी लग्न; काही वर्षांतच घटस्फोट,घेतली कोटींची पोटगी
बॉलिवूडमध्ये असे बरेच अफेअर, लग्न आणि घटस्फोट आहेत जे कायम लक्षात राहणारे आणि चर्चेत राहणारे आहेत. यातील एक जोडी अशी...
मोठी बातमी! महायुती सरकार बॅकफुटवर, हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटक जखमी
काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार: हर्षवर्धन सपकाळ
Match Fixing IPL 2025 – राजस्थान रॉयल्सची मॅच फिक्सिंग! लखनऊ विरुद्धचा सामना वादाच्या भोवऱ्यात
Pahalgam Terror Attack – काश्मीर हादरले! दहशतवाद्यांचा पर्यटकांवर बेछूट गोळीबार, एकाचा मृत्यू; 12 जखमी
Trousers For Women- उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा या ट्राउझर्समध्ये दिसाल स्टायलिश!