हिंदुस्थानात निवडणुकीत गडबड घोटाळा, राहुल गांधी यांचा आरोप

हिंदुस्थानात निवडणुकीत गडबड घोटाळा, राहुल गांधी यांचा आरोप

हिंदुस्थानात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठा गडबड घोटाळा झाला. निवडणूक आयोगानेच काही तडजोडी करून हे सर्व घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना केला. राहुल गांधी यांनी बोस्टन येथील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुस्थानातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोट ठेवले.

या मुद्द्यांकडे वेधले लक्ष

  • महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत स्पष्टच शब्दात सांगायचं तर, या निवडणुकीत तरुणांच्या संख्येपेक्षा अधिक मतदान झालं. हे एक वास्तव असल्याचे सांगत राहुल गांधी निवडणुकीतील गैरप्रकारकडे लक्ष वेधले.
  • निवडणूक आयोगाने संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मतदानाची जी आकडेवारी दिली त्यामध्ये आणि 5.30 ते 7.30 काळात तब्बल 65 लाख मतदारांनी मतदान केलं, मात्र असं घडणं अशक्य आहे.
  • कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी किमान 3 मिनिटं लागतात. हे लक्षात घेता मतदार पहाटे 2 वाजेपर्यंत रांगेत उभे होते आणि रात्रभर मतदान सुरू होते. प्रत्यक्षात असं काही घडलं नाही.
  • नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत अनियमितता करून मोठ्या प्रमाणात गडबड करण्यात आल्याचे सांगितले. मतदानाची वेळ संपण्याच्या काळात दिलेली मतदानाची आकडेवारी आणि त्यानंतरच्या दोन तासांतील मतदानाची आकडेवारी ही हेच दर्शविते की, निवडणूक आयोगानेच तडजोडी करून हे केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

….म्हणून निवडणूक कायद्यात बदल

आम्ही निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेची चित्रिकरण केल आहे का? अशी विचारणा करून ते देण्याची मागणी मागणी केली होती. मात्र, त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. एवढंच नाही तर त्यांनी कायदाच बदलला. त्यामुळे आता चित्रिकरण मागता येणार नाही. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म