मुंबईवर पाणीकपातीचे संकट, पाणीसाठा आला 28 टक्क्यांवर

मुंबईवर पाणीकपातीचे संकट, पाणीसाठा आला 28 टक्क्यांवर

मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या माऱ्याने मुंबईकर हैराण झाले असताना वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28 टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, सध्या तरी पाणीकपातीचा कोणताही विचार नाही. मात्र, 15 मेपर्यंत तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल, असे जल अभियंता विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते; परंतु यंदा सातही धरणांत 4 लाख 11 हजार 355 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

तर मुंबईकडे असेल जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी 

राज्य सरकारने मुंबईला 2 लाख 30 हजार 500 मिलियन लिटर राखीव साठा तत्त्वतः उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्यावेळी पाणीसाठा अगदीच कमी होईल त्यावेळी राज्य सरकारच्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून हा साठा घेण्यात येईल. हा राखीव साठा घेतला तर मुंबईकरांना जुलैअखेरपर्यंत पाण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र, याबाबतचा निर्णय मे महिन्याच्या पहिल्या किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात घेतला जाईल, असे जल अभियंता विभागाने सांगितले.

21 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा     –                     68,312

मोडक सागर   –    29,268

तानसा           –    33,131

मध्य वैतरणा –    66,494

भातसा           –   1,99,854

विहार             –    11,105

तुळशी            –      3,190

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म