वयस्कर व्यक्तींनी नारळ पाणी का पिऊ नये? तज्ञांकडून घ्या जाणून

वयस्कर व्यक्तींनी नारळ पाणी का पिऊ नये? तज्ञांकडून घ्या जाणून

नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. प्रत्येक आजारी व्यक्तीला नारळाचे पाणी प्यायला देत असतो. त्याचबरोबर तुम्ही जर नारळच्या पाण्याचे सकाळी उठून सेवन केल्यास तुम्हाला पोट आणि शरीराला थंडावा तर मिळतोच शिवाय लठ्ठपणा, अपचन, डिहायड्रेशनसारख्या समस्याही दूर राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की, वयस्कर व्यक्तींनी दररोज नारळाचे पाणी पिणे चांगले नसते. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे काही लोकांच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही जर दररोज नारळपाणी पित असाल, तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नारळपाणी सेवन करणे महत्वाचे आहे.

डॉ. जमाल ए खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये वयस्कर व्यक्तींनी तसेच वाढत्या वयात नारळ पाणी का पिऊ नये हे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी व्हिडिओमध्ये असेही सांगितले की नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वयस्कर व्यक्तींनी जर दररोज नारळ पाणी प्यायले तर त्यांच्या हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. तसेच नारळ पाणी हे दैनंदिन दिनचर्येचा भाग नाही. मात्र तुम्ही जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर असता तेव्हा शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी पिऊ शकता.

वयस्कर व्यक्तींनी नारळ पाणी का पिऊ नये?

पोटॅशियमचे प्रमाण जास्त 

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. त्यातच काही वृद्धांमध्ये जर किडनी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे कारण अतिरिक्त पोटॅशियम शरीरातून बाहेर पडू शकत नाही, ज्यामुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.

रक्तदाबावर परिणाम 

जर एखादी वयस्कर व्यक्ती आधीच कमी रक्तदाब म्हणजेच हायपोटेन्शन या आजारांशी औषध घेत असेल, तर नारळ पाणी प्यायल्याने त्यांचे रक्तदाब आणखी कमी होऊ शकते. यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा आणि बेशुद्धी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

साखरेची पातळी वाढू शकते 

नारळाचे पाणी नैसर्गिकरित्या गोड असते आणि त्यात कार्बोहायड्रेट्स देखील असतात. त्यामुळे ज्या वयस्कर व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी जास्त प्रमाणात पिणे हानिकारक ठरू शकते कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. व त्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते.

पोटाच्या समस्या उद्भवू शकतात 

काही वयस्कर व्यक्तींना नारळ पाणी प्यायल्यानंतर गॅस, पोटदुखी किंवा जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात.

हृदय आणि किडनीच्या रुग्णांसाठी धोकादाय‍क

ज्यांना आधीच हृदयरोग किंवा किडनीच्या समस्या आहेत त्यांनी मर्यादित प्रमाणात नारळ पाणी प्यावे. जास्त पोटॅशियम आणि सोडियममुळे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. नारळ पाणी पिण्याचे काही फायदे देखील आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नारळ पाणी प्यायला आवडत असेल आणि तुम्ही स्वतःला थांबवू शकत नसाल, तर प्रथम या विषयावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि नंतर ते पिणे महत्वाचे आहे. तसेच, जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर नारळ पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान
बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. मग त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असो वा त्यांच्या आगामी सिनेमांमुळे ते सतत चर्चेत...
सावळ्या रंगामुळे 1000 वेळा रिजेक्ट झाली; स्टारकिडशी लग्न, घर तोडल्याचा आरोप; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
रमजानच्या महिन्यात मुस्लिम अभिनेता पोहोचला तिरुपती मंदिरात, फोटो पाहून धर्म रक्षक संतापले
सलमान – अभिषेक नाही, ‘या’ श्रीमंत उद्योजकासोबत ऐश्वर्याला करायचं होतं लग्न, दोघांचे Unseen फोटो व्हायरल
घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली ‘आधी माझे…’
वयाच्या 7 व्या वर्षी घर सोडलं, कॉल सेंटरमध्ये काम केलं,अन् आज आहे इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक
आदर्श रस्त्यांमुळे पुणे सुसाट ! सोलापूर-नगर रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा