समंथाच्या चाहत्यांकडून सोभिताची ट्रोलिंग; अखेर नाग चैतन्य म्हणाला “माझ्या भूतकाळाशी..”

समंथाच्या चाहत्यांकडून सोभिताची ट्रोलिंग; अखेर नाग चैतन्य म्हणाला “माझ्या भूतकाळाशी..”

अभिनेता नाग चैतन्यने 2021 मध्ये समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. नाग चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे दोन गट पडले. एका गटाने नाग चैतन्यची बाजू घेतली, तर दुसऱ्या गटाने समंथाविषयी सहानुभूती व्यक्त केली. मात्र सोभितासोबतच्या नाग चैतन्यच्या नव्या नात्यामुळे या दोघांनाही प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लग्नापूर्वी समंथाच्या चाहत्यांनी सोभितावर बरीच टीका केली. किंबहुना आजसुद्धा तिला सोशल मीडियावर नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्य मोकळेपणे व्यक्त झाला.

नुकत्याच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत नाग चैतन्य म्हणाला, “खरंतर मला तिच्याबद्दल वाईट वाटतं. कारण या सर्वांत तिची चूक काहीच नव्हती आणि जे काही तिला सहन करावं लागलं, त्यासाठी ती अजिबातच जबाबदार नव्हती. आम्हा दोघांची भेट अत्यंत सहज आणि सुंदररित्या झाली होती. सोशल मीडियावरील चॅटनंतर आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. हे नातं हळूहळू मजबूत होत गेलं. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, माझ्या भूतकाळाशी तिचा काहीच संबंध नाही. त्यामुळे मला या गोष्टीचा खूप राग येतो की तिला हे सगळं सहन करावं लागतंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sobhita (@sobhitad)

यावेळी नाग चैतन्यने सोभिताच्या स्वभावाचं कौतुक केलं. “ज्याप्रकारे तिने सर्वकाही समजून घेतलं, त्याबद्दल मी तिचे आभार मानले पाहिजे. तिने खूप समजूतदारपणा दाखवला आणि यातून खूप सामंजस्यपणे पुढे आली. इतक्या नकारात्मकतेचा सामना करणं सोपं नाही. माझ्यासाठी ती खरी हिरो आहे”, अशा शब्दांत त्याने पत्नीची प्रशंसा केली.

नाग चैतन्य आणि सोभिता हे लग्नाआधी दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते. डेटिंगदरम्यान दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी दोघांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाविषयीची माहिती दिली. या दोघांच्या लग्नाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नागार्जुन यांनी सोभिताला जेव्हा त्यांच्या घरी चहासाठी बोलावलं होतं, तेव्हाच नाग चैतन्यची तिच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. त्यामुळे सोभिता आणि नाग चैतन्यला एकत्र आणण्यात नागार्जुन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते....
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती
झोपण्यापूर्वी हे पाणी प्या… चमत्कारीक फायदे ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल; वस्तू छोटी पण…
IND Vs PAK – टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 6 गडी राखून दणदणीत विजय
राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल; विद्यार्थ्यांवर अन्याय?