“मुलगा नसता तर पत्नीपासून विभक्त झालो असतो”; सोनू निगम असं का म्हणाला होता?

“मुलगा नसता तर पत्नीपासून विभक्त झालो असतो”; सोनू निगम असं का म्हणाला होता?

सोनू निगम हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. संगीत श्रेत्रातील अमूल्य योगदानामुळे सोनू निगमला पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. सोनू निगमचं करिअर आणि त्याची गाणी अनेकांना माहित असली तरी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फारसं माहीत नाही. वैयक्तिक आयुष्याबद्दल सोनू निगम फारसं व्यक्तही होत नाही. त्याची पत्नी मधुरिमासुद्धा प्रकाशझोतापासून लांबच राहणं पसंत करते. सोनू निगम आणि मधुरिमा यांची पहिली भेट एका कार्यक्रमात झाली होती. दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर असूनही ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर या दोघांनी 15 फेब्रुवारी 2002 रोजी लग्न केलं. मात्र लग्नाच्या पाच वर्षांच्या आतच सोनू निगम आणि मधुरिमाच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या.

मधुरिमाने 2007 मध्ये मुलाला जन्म दिला. त्यापूर्वीच 2005 मध्ये सोनू आणि मधुरिमा यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. गायिका सुनिधी चौहान आणि स्मिता ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे सोनू निगमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्याचे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. एका जुन्या मुलाखतीत खुद्द सोनू त्याच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. संसारात एक अशी वेळ आली होती, जेव्हा मी खरंच घटस्फोटाचा विचार करत होतो, अशी कबुली सोनू निगमने दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam Live (@sonunigamlive)

“जर माझा मुलगा नसता तर मी अत्यंत आदरपूर्वक आणि कोणत्याही नकारात्मकतेशिवाय माझ्या पत्नीला सांगितलं असतं की, हे नातं मी अजून टिकवू शकत नाही. पण आमच्या मुलाला त्याचे दोन्ही पालक सोबत हवे होते. माझी पत्नी खूप चांगली आहे, पण कधीकधी संसारात समस्या येतात आणि लोक विभक्त होतात. मी सहा महिने काम केलं असतं आणि सहा महिने आईच्या गावी हिमालयात गेलो असतो”, असं तो म्हणाला होता.

2021 मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीतही सोनू निगमने पत्नी मधुरिमासोबतच्या गेल्या 12 वर्षांच्या संसारात अनेक अडचणी आल्याचं म्हटलं होतं. मात्र या अडचणींवर मात करून दोघांनीही मुलगा नेवान निगमचं संगोपन एकत्र करायचं ठरवलंय. एप्रिल 2021 मध्ये हो दोघं ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एकत्र आले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते....
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती
झोपण्यापूर्वी हे पाणी प्या… चमत्कारीक फायदे ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल; वस्तू छोटी पण…
IND Vs PAK – टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 6 गडी राखून दणदणीत विजय
राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल; विद्यार्थ्यांवर अन्याय?