‘या’ व्यक्तीला पंतप्रधानपदावर बसलेलं पहायचंय! विनेश फोगाटनं व्यक्त केलं मत, सांगितलं कारण

‘या’ व्यक्तीला पंतप्रधानपदावर बसलेलं पहायचंय! विनेश फोगाटनं व्यक्त केलं मत, सांगितलं कारण

हरयाणातील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी विनेश फोगाट हिने कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मैदानात उडी घेतली. जुलाना मतदारसंघातून तिला तिकीट देण्यात आले आहे. या निवडणुकीत ती तयारीनिशी उतरली असून प्रचारसभा, भेटीगाठीही सुरू आहेत. याच दरम्यान तिने लल्लनटॉपला एक मुलाखत दिली. यात तिने आपल्या स्वप्नातील पंतप्रधान कोण हे देखील सांगितले आहे.

राहुल गांधी की प्रियंका गांधी, यापैकी कोणाला पंतप्रधानपदावर बसलेले पहायचे आहे? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विनेश फोगाट हिला विचारण्यात आला. याला उत्तर देताना ती म्हणाली की, खरे सांगायचे तर माझे स्वप्न आहे की प्रियंका गांधी यांनी देशाचे पंतप्रधान बनावे. एक महिला म्हणून मला प्रियंका यांना पंतप्रधानपदावर बसलेले पहायचे आहे.

ती पुढे म्हणाली की, राहुल गांधी यांचा स्वभाव चांगला आहे, माणूस म्हणूनही ते चांगले आहेत. पण माझे स्वप्न आहे की प्रियंका गांधी पंतप्रधान बनाव्यात. एक महिला असल्याने राजकारणात महिला पुढे जात असतील तर मला वेगळाच आनंद होतो, असेही ती म्हणाली.

तसेच हरयाणात मुख्यमंत्रीपदावर कुणाला पहायची इच्छा आहे? असे विचारले असता विनेश म्हणाली की, कुमारी शैलजा, दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा यापैकी कुणीही मुख्यमंत्री कुणीही बनो, ते माझ्या हातात नाही. तसे असते तर मीच मुख्यमंत्री झाले असते. कुमारी शैलजा मुख्यमंत्री झाल्या तरी हरकत नाही, त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत.

साक्षी मलिक राजकारणात का आली नाही? याचे उत्तर देताना ती म्हणाले की, हा तिचा वैयक्तिक निर्णय असून बजरंगनेही तिच्यावर दबाव टाकला नाही. कुस्तीमध्ये जाण्याचाही निर्णय माझा होता आणि कुस्ती सोडून राजकारणात येण्याचा निर्णयही माझा आहे. ना आम्ही साक्षीवर दबाव टाकू शकतो, ना ती आमच्यावर.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील...
Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई
श्वेता तिवारी पासून अरबाज खान पर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी केलंय पाकिस्तानी सिनेविश्वात काम
आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
‘उदे गं अंबे..’ मालिकेत देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी महेश कोठारेंच्या पत्नीचं मोलाचं योगदान
भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!
दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक