चांगले गणवेश दिले नाही, तर किमान चांगले अन्न तर द्यावे! अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

चांगले गणवेश दिले नाही, तर किमान चांगले अन्न तर द्यावे! अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मिंधे-भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या विकास कामांच्या नावाखाली प्रचंड गोंधळ उडाल्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील कळव्यातील एका शाळेत देण्यात येणाऱ्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला. शाळेतील अन्न खाल्यामुळे सुमारे 38 विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास झाला आहे. त्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधी निकृष्ठ दर्जाचे गणवेश आणि आता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे आरोप सरकारवर करण्यात येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सरकारला सुनावत हल्लाबोल केला आहे.

अंबादास दानवे यांनी कळव्यातील खासगी शाळेत घडलेल्या प्रकारावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिंधे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शाळेतील निकृष्ठ दर्जाचे अन्न खाऊन विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. चांगले गणवेश देऊ शकले नाही, या सरकारने लेकरांना किमान चांगले अन्न तर द्यावे! अशा शब्दात दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात या घोषणा केवळ फार्स असल्याचे एकेका घटनेतून समोर येत आहे. शाळा सुरू होऊन सहा महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मात्र मिळालेले नाही. यानंतर आता मुलांना शाळेत मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा देखील घसरला आहे. ‘विषबाधा होईल इतपत खराब माल पुरवायचा म्हणजे हे या सरकारच्या माणुसकी शून्यतेचे लक्षण आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यात ही गत असेल तर अन्यत्र विद्यार्थी काय खात आहेत, हे तपासले पाहिजे’, असे यावेळी अंबादास दानवे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील...
Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई
श्वेता तिवारी पासून अरबाज खान पर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी केलंय पाकिस्तानी सिनेविश्वात काम
आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
‘उदे गं अंबे..’ मालिकेत देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी महेश कोठारेंच्या पत्नीचं मोलाचं योगदान
भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!
दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक