राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा ‘आक्रोश मोर्चा’, कणगर येथील हल्लेखोरांना त्वरित अटक करा

राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा ‘आक्रोश मोर्चा’, कणगर येथील हल्लेखोरांना त्वरित अटक करा

मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात, तसेच विविध मागण्यांसंदर्भात हजारोंच्या संख्येने राहुरी येथील तहसील कार्यालयावर ‘मातंग आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. लहुजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले.

राहुरी तालुक्यातील कणगर येथे लाहुंडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर घटनेला सुमारे वीस दिवस झालेत, मात्र या घटनेतील मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. सदर आरोपीला तीन दिवसांत अटक न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर मातंग समाजाच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

राहुरी तालुक्यासह नगर जिह्यात मातंग समाजावर अत्याचार होत आहेत. या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात तसेच विविध मागण्यांसंदर्भात लहुजी क्रांती सेनेच्या वतीने सोमवारी मातंग आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला गाडगे महाराज आश्रम शाळा येथून सुरुवात होऊन नगर-मनमाड रोड, जिजाऊ चौक, नवी पेठ, शनी चौक, स्टेशन रोड या मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. त्या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून संताप व्यक्त करून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील रजेवर असल्याने नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दाखविली होती. मात्र, मोर्चेकरी आक्रमक झाले होते. जोपर्यंत तहसीलदार पाटील निवेदन स्वीकारण्यास येत नाहीत, तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर करताच रजेवर असणारे तहसीलदार पाटील यांनी कार्यालयात येऊन मोर्चाकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

मोर्चामध्ये लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक-अध्यक्ष विष्णू कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे, सुनील शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक-अध्यक्ष कांतीलाल जगधने, नंदूभाऊ शिंदे, सोन्याबापू जगधने, बाबा साठे, बाबासाहेब शेलार सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले.. गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले..
परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदा जखमी झाला. गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर...
हा तर बिग बॉस सोडून इथे फिरतोय..; रितेश देशमुखच्या फोटोंवर चाहत्यांची नाराजी
कोणती मोठी सेलिब्रिटी आहे ही, काळं फासा हिला…, तृप्ती डिमरीवर का भडकली जनता, व्हिडीओ पाहिल्यानंतर बसेल धक्का
बहिणीकडून अभिनेत्याचा पर्दाफाश! दाखवला बेगमचा चेहरा, धर्म बदलून केला निकाह
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे! प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश, नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचा आरोप
महायुतीचे नेते स्वाभिमानी जनतेला घाबरले