एकीकडे हिंदूंवर अत्याचार, दुसरीकडे बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी पायघड्या; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं
बांगलादेशमध्ये जुलै महिन्यात आरक्षणविरोधात जनता रस्त्यावर उतरली आणि उग्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान हिंदू समाजाला विशेषकरून टार्गेट करण्यात आले. आजही तिथला हिंदू समाज भीतीच्या छायेखाली जगत आहे. एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना दुसरीकडे बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी हिंदुस्थानमध्ये पायघड्या टाकल्या जात आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे.
हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही सामने चेन्नईत खेळले जाणार असून पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. या सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रात्री एक ट्विट केले. यात त्यांनी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा दाखला देत परराष्ट्र मंत्रालयाला काही बोचरे सवाल विचारले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, बांगलादेशचा क्रिकेट संघ हिंदुस्थान दौऱ्यावर आहे. काही माध्यमे आणि सोशल मीडियावर आलेल्या वृत्तानुसार गेल्या 2 महिन्यात बांगलादेशमधील हिंदूंना हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे का? परराष्ट्र मंत्रालयाकडून हे जाणून घेण्यास उत्सूक आहे.
याचे उत्तर होय असे असेल आणि हिंदूंसह इतर अल्पसंख्यांना बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा सामना करावा लागला असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार बीसीसीवर एवढे मेहरबान का आहे आणि दौऱ्याला परवानगी का देत आहे? आणि उत्तर नाही असे असेल तर बांगलादेशमधील हिंसाचाराबाबत सोशल मीडिया व माध्यमांतील वृत्तांशी परराष्ट्र मंत्रालय सहमत आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
So Bangladesh cricket team is on tour of India.
Just keen to know from the Ministry of External Affairs, whether hindus in Bangladesh faced violence in the past 2 months, as told to us by some media and social media?
If yes, and hindus and other minorities faced violence, then…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 17, 2024
बांगलादेशातील हिंसाचाराच्या निमित्ताने इथे ट्रोल्स देशवासियांमध्ये द्वेष पसरवत आहेत आणि त्याच बांगलादेशी संघासाठी बीसीसीआय पायघड्या अंथरत आहे. या हिंसाचाराविरोधात सक्रियप्रणे प्रचार करणारे बीसीसीआयला एकही प्रश्न विचारत नाहीत याचे मला आश्चर्य वाटत आहे. हा फक्त हिंदुस्थानात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की केवळ निवडणुकीचा प्रचार आहे? असा बोचरा सवालही आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List