Mumbai Local – पश्चिम रेल्वेचं नवीन वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार 12 नवीन लोकल

Mumbai Local – पश्चिम रेल्वेचं नवीन वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार 12 नवीन लोकल

मुंबईत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेकडून रेल्वेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. हे वेळापत्रक 12 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. वेळापत्रकात 12 नव्या फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर 12 डब्ब्यांच्या 10 लोकलचे अपडेशन करण्यात आले असून त्या आता 15 डब्यांसह धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सुरू असणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांची संख्या 1394 वरून 1406 पर्यंत वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली येथून चर्चगेटसाठी एक स्लॉट लोकल सुरू करण्यात येणार आहे. विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते नालासोपारा अशी जलद लोकल नव्याने सुरू होणार आहे. चर्चगेट ते गोरेगाव अशा दोन धिम्या लोकल चालवल्या जातील. तर, डहाणू रोड ते विरारपर्यंत दोन स्लो लोकल चालवल्या जातील. तसेच चर्चगेटपासून अंधेरीपर्यंत एक स्लो लोकल चालवली जाईल. विरार ते डहाणू रोडपर्यंत दोन धिम्या लोकल चालवल्या जाणार आहेत.

गोरेगाव ते कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका उभारण्याचं काम सध्या सुरू असल्यामुळे ते पूर्ण झाल्यावरच हे वेळापत्रक लागू होईल. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी राम मंदिर ते मालाड स्थानकादरम्यान लोकलचा वेग 30 किमी प्रतितास करण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून 4 ऑक्टोबरपर्यंत दररोज 150 ते 175 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील...
Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई
श्वेता तिवारी पासून अरबाज खान पर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी केलंय पाकिस्तानी सिनेविश्वात काम
आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
‘उदे गं अंबे..’ मालिकेत देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी महेश कोठारेंच्या पत्नीचं मोलाचं योगदान
भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!
दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक