रस्ता बनवण्यासाठी 1900 कोटींचा खर्च, पण टोलवरून 8000 कोटींची वसुली! नितीन गडकरींनी दिले उत्तर

रस्ता बनवण्यासाठी 1900 कोटींचा खर्च, पण टोलवरून 8000 कोटींची वसुली! नितीन गडकरींनी दिले उत्तर

दिल्ली-जयपूर महामार्गाच्या बांधकामासाठी 1900 कोटी रूपये लागले. पण त्यावर 8000 कोटींचा टोल वसूल करण्यात आला. नुकतेच माहितीच्या आधिकाराखाली या महामार्गाबाबत माहिती मिळाली आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावर आता केंद्रीय रस्ते वाहूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते बनविण्यासाठी खर्च कमी आणि त्यावर वसुली जास्त केल्याचे आरोप केले जातात. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, एखादे घर किंवा कार रोख देऊन खरेदी केल्यास ती आपल्याला अडीच लाखाला पडते. पण तीच गोष्ट कर्जावर घेतली तर त्याची किंमत 5.5 ते 6 लाख रूपये होते. त्यासाठी व्याज भरावे लागले. त्यामुळे अनेकदा रस्त्यांची कामेही कर्ज घेऊन केली जातात.

राजस्थानमधील दिल्ली-जयपूर महामार्गावरील बांधकामासाठी 1900 कोटी रूपये खर्च झाले आणि त्यावर मनोहरपूर टोल प्लाझावर 8000 कोटींची टोल वसुली केली. गडकरी यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, हा रस्ता 2009 साली आघाडी सरकारने मंजूर केला होता. त्यासाठी 9 बॅंकांकडून कर्ज घेतले होते. तो रस्ता तयार करतानाही अनेक अडचणी आल्या. ठेकेदार पळून गेले, काही बॅंकांनी न्यायालयात दावे दाखल केले. नवीन कंत्राटदार आले. त्यानंतर नवीन ठेकेदारांना हटविण्यात आले. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्या निर्णयावर स्थगिती मिळवली. मग या रस्त्याचा नवीन डीपीआर तयार केला गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे. सहा पदरी रस्ता बनवायचा असेल तर अतिक्रमणे हटवावी लागतील. या सर्व प्रकारामुळे रस्त्याचा खर्च वाढतो आणि टोल वसुलीची मुदत वाढते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?