सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात अन् फडणवीस त्यांना पक्षात घेतात, जरांगे पाटील यांचे पुन्हा भाजपवर टीकास्त्र

सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात अन् फडणवीस त्यांना पक्षात घेतात, जरांगे पाटील यांचे पुन्हा भाजपवर टीकास्त्र

सरकार कसे बनवायचे हे फडणविसांना माहित आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात आणि फडणवीस त्यांना पक्षात घेतात. फडणवीस माणुसकी जिवंत करा आणि आरक्षण द्या, नाही तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बीड येथील घोंगडी बैठकीत ते बोलत होते.

आज बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित भाषणात जरांगे यांनी पुन्हा फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपातील मराठा आता फडणवीस यांच्यापासून दूर चालला आहे. भाजपच्या माजी आमदारांची रांग लागत आहे. त्यांचे आमदार रात्रीच भेटायला येतात. भाजपमध्ये  लवकरच मोठा स्पह्ट होणार असा दावा त्यांनी केला. भाजपच्या पुण्यातील एका नेत्याने तर फ्लॅट विकला पण त्याला तिकीट मिळणार नाही, असे ते म्हणाले.

बीडच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत पेलेली पाडापाडी योग्य होती. जनतेला प्राधान्य देणारा हा जिल्हा आहे. आधी जात आणि नंतर पक्ष, जातीला पाठ दाखवून मागे फिरायचे नाही, असेही त्यांनी बजावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित...
‘तुम्हाला पटेल किंवा..’ अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला ‘बाज नहीं आओगी तुम’
राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनचं असं आहे नातं! ‘हा’ व्हिडीओ पुरावा, असं असताना का होतेय घटस्फोटाची चर्चा?
प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका, अभिनेत्रीच्या लावणीवर चाहते फिदा
आता रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! नगर – मनमाड रेल्वेमार्गासाठी पढेगाव ते राहुरी चाचणी यशस्वी
…म्हणून शिंदे प्रकरण मुळापासून संपवलं! संजय राऊत यांचा गंभीर आरोप