Ind Vs Ban 1st Test – अश्विनचे शतक अन् बुमराहचा चौकार, दुसऱ्या दिवशी बांगलादेशी ‘वाघ’ ढेपाळले

Ind Vs Ban 1st Test – अश्विनचे शतक अन् बुमराहचा चौकार, दुसऱ्या दिवशी बांगलादेशी ‘वाघ’ ढेपाळले

हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. दुसऱ्या दिवसा अखेर टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा करत 308 धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर या सामन्यात जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा सहावा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे.

रविचंद्रन आश्विन (113 धावा) आणि रविंद्र जडेजा (86 धावा) यांनी केलेल्या महत्वपूर्ण 196 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला आपल्या पहिल्या डावात 376 धावा करण्यात यश आले. प्रत्युत्तरात बांगलादेशला आपल्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या गोलादजांनी चांगलेच झखडून ठवले. यामुळे त्यांना फक्त 149 धावा करण्यात यश आले. शकिब उल हसन (32 धावा) व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच आकाश दीप, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. त्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 या धावसंख्येवर बाद झाला.

टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून टीम इंडियाला तीन महत्वपूर्ण हादरे बसले आहेत. कर्णधार रोहित शर्मा (5 धावा) स्वस्तात माघारी परतला. यानंतर यशस्वी जैसवाल (10 धावा) आणि विराट कोहली (37 धावा) हे बाद झाले. त्यानंतर शुभमन गिल (33 धावा) आणि ऋषभ पंत (12 धावा) दोघांनीही डाव सावरला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसा अखेर टीम इंडियाने 3 विकेट गमावत 81 धावा केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द
केंद्रातील मोदी सरकारला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. सोशल मीडियातील बातम्या तसेच इतर पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान नियमावलीत केलेली...
मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली
तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्ला
ना मोकळी जागा, ना सूर्यप्रकाश, नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावरच गदा येतेय; एसआरएच्या बिल्डिंग या उभ्या झोपडपट्ट्या
नांदेडात भाजपकडून फाटक्या साडय़ांचे वाटप, लाडक्या बहिणींनी दिले शिव्याशाप
फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचा आरोप
एकही फ्लॅट न विकता म्हाडाने कमावले पावणेसहा कोटी, अर्ज शुल्कातून प्राधिकरणाची बक्कळ कमाई