ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; DVC वर तातडीने कारवाईची केली मागणी

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; DVC वर तातडीने कारवाईची केली मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील पुराबाबत पत्र लिहिले आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) सोबत असलेल्या वादावर पुनरुच्चार करताना, त्यांनी सांगितलं की दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने सुमारे 5 लाख क्युसेक पाणी अनियोजितरितीने सोडले, ज्यामुळे दक्षिण बंगाल जिल्ह्यांमध्ये पूर आला.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी केंद्राला तात्काळ निधी देण्याची विनंती केली. पुरामुळे राज्यात मोठा विध्वंस झाला तो कमी करण्यासाठी केंद्रीय निधी त्वरित जारी करण्यास या पत्रात सांगितलं आहे.

‘2009 नंतर लोअर दामोदर आणि लगतच्या भागात सर्वात जास्त पुराचा सामना करत आहे. मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करा आणि संबंधित मंत्रालयांना या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य म्हणून सोडवण्याचे निर्देश द्या, यामध्ये भरीव केंद्रीय निधी मंजूर करणे आणि तो निधी पोहोचवणे याचा समावेश आहे. ज्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या हितासाठी व्यापक पूर व्यवस्थापनाची कामे हाती घेणे आवश्यक आहे’, असं या पत्रात लिहिले आहे.

ममता यांनी आरोप केला की ‘डीव्हीसीच्या मालकीच्या आणि देखभाली अंतर्गत असलेल्या मैथॉन आणि पानशेत धरणांतून सुमारे 5 लाख क्युसेकने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ‘अनयोजितरितेने आणि एकतर्फी निर्णयातून सोडला’ यामुळे बंगालमध्ये पूर आला.

गुरुवारी, ममता बॅनर्जी यांनी झारखंड सरकारवर टीका केली आणि तीन दिवसांसाठी आंतरराज्य सीमा सील करण्याचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द
केंद्रातील मोदी सरकारला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. सोशल मीडियातील बातम्या तसेच इतर पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान नियमावलीत केलेली...
मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली
तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्ला
ना मोकळी जागा, ना सूर्यप्रकाश, नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावरच गदा येतेय; एसआरएच्या बिल्डिंग या उभ्या झोपडपट्ट्या
नांदेडात भाजपकडून फाटक्या साडय़ांचे वाटप, लाडक्या बहिणींनी दिले शिव्याशाप
फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचा आरोप
एकही फ्लॅट न विकता म्हाडाने कमावले पावणेसहा कोटी, अर्ज शुल्कातून प्राधिकरणाची बक्कळ कमाई