Latur News- नुकसानीच्या पंचनाम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे आंदोलन

Latur News- नुकसानीच्या पंचनाम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे आंदोलन

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उजेड (हिसामाबाद) मंडळ येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .यासंदर्भात कृषी विभागाला व महसुल विभागाला लेखी तक्रार देऊन सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. यामुळे हिसामाबाद महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तूर, मूग, उडीद या पिकांचे तसेच भाजीपाला व मोठ्या प्रमाणात हाती आलेले सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले असून या मागण्याकडे प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उजेड येथील शेतकऱ्यांनी आज निलंगा घरणी रोडवर एक तास रस्ता रोको आंदोलन केले .

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल अशा इशारा उजेड येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे प्रशासनास दिलेला आहे. यासंदर्भात आबासाहेब पाटील उजेडकर शेतकरी यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांचे शिरूर अनंत पाळ तहसीलदार यांना नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब मदत द्यावी यासाठी रीतसर निवेदन दिलेले आहे.

अद्याप पर्यंत महसूल व कृषी विभागाचा कुठलाही अधिकारी पंचनामेसाठी शेतकऱ्याच्या बांधावर आलेला नाही. त्यामुळे रास्ता रोकोचा, आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला. प्रशासनाने याची दखल घेऊन सरसकट पंचनामे शेतकऱ्याच्या नुकसानीचे करावेत अन्यथा शेतकऱ्याच्या रोशाला प्रशासनास व शासनास सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा
बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र या एन्काऊंटरवर...
Akshay Shinde Encounter : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या?; कोर्टात वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Akshay Shinde Encounter: हे एन्काऊंटर होऊच शकत नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
Akshay Shinde Encounter Hearing : तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना घेतलं फैलावर
कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात…पंकजा मुंडेंनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रथमच केले भाष्य
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरआधी अक्षयने आईवडिलांकडे 500 रुपये मागितले, देहबोली कशी होती? बोलणं काय झालं?; वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Sharmila Thackeray : अक्षय शिंदे कोणी संत नाही, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत, शर्मिला ठाकरेंची रोखठोक भूमिका