देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात; भरधाव कार ट्रकला मागून धडकली, 7 जण जागीच ठार

देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात; भरधाव कार ट्रकला मागून धडकली, 7 जण जागीच ठार

अरावली जिल्ह्यातील श्यामलाजी मंदिरात दर्शन करून अहमबादाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली. साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथे झालेल्या या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पार चेंदामेंदा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. कारमध्ये एकूण 8 जण होते. हे सर्व श्यामलाजी मंदिरात दर्शन करून अहमदाबादकडे येत होते. मात्र भरधाव वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली आणि भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चेंदामेंदा झालेली कार कटरच्या सहाय्याने कापून मृतेदह बाहेर काढण्यात आले. सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी होता. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर कारचा पार चक्काचूर झाला होता. त्यावरून कारचा वेग जास्त असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि प्रशासनाने अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले? अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले?
बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर सोमवारी करण्यात आले. त्यानंतर राज्यात सत्ताधारी अन् विरोधक समोरासमोर आले...
रॅम्प वॉकदरम्यान ऐश्वर्या रायसोबत घडलं असं काही..; अभिनेत्रीच्या आत्मविश्वासाचं होतंय कौतुक
हिंमतसुद्धा करू नका..; तिरुपती लड्डू वादाची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्यावर भडकले पवन कल्याण
वीज कर्मचारी आज, उद्या संपावर जाणार
परतीच्या पावसाने नगर जिल्हय़ाला झोडपले! नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांत पाऊस; सरासरी 129 मि.मी. पावसाची नोंद
सहकारी संस्था संपवण्याचे घातक राजकारण खेळले जात आहे, शरद पवार यांची टीका
पश्चिम रेल्वेत 5066 शिकाऊ पदांसाठी भरती